महात्मा गांधी भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi

Mahatma Gandhi Speech in Marathi – Speech On Mahatma Gandhi in Marathi महात्मा गांधी जयंती भाषण मराठी आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महोदय, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सूत्रसंचालक, उपस्थित मान्यवर तसेच, आयोजक वर्ग या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. कारण, त्यांच्यामुळे मला आज याठिकाणी महात्मा गांधीजीं विषयी बोलण्याची संधी मिळतेय. खरंतर मित्रांनो, आपल्या भारतमातेचे थोर सुपूत्र, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच, संपूर्ण विश्वाला अहिंसेचा महान संदेश देणारे, आपल्या भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे वंदनीय युगपुरूष होते.

देशाच्या स्वातंत्र्यकालीन इतिहासातील महानक्रांतिकारक, शांतता व अहिंसेचे पुजारक ‘महात्मा गांधी’ यांचा जन्म सन २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरात राज्यामधील पोरबंदर या शहरात झाला होता. महात्मा गांधींचे पूर्ण नाव ‘मोहनदास करमचंद गांधी’ असे होते. परंतु, आपल्या भारतातील लोक प्रेमाने त्यांना बापू असे म्हणत असतं. रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या बापूंना  सर्वप्रथम “महात्मा” ही उपाधी धारण केली होती.

“बापू सन्मान करतो आम्ही, तुमच्या महान नेतृत्वाचा. भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला, हा दाखला आहे तुमच्या कर्तुत्वाचा!”

mahatma gandhi speech in marathi

महात्मा गांधी भाषण मराठी – Mahatma Gandhi Speech in Marathi

Mahatma gandhi bhashan.

तसेच, सन १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना “राष्ट्रपिता” म्हणून पहिल्यांदा संबोधले होते. महात्मा गांधी यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई असे होते. महात्मा गांधी यांचे वडिल करमचंद गांधी हे तत्कालीन काठेवाड प्रांतामधील पोरबंदर या ठिकाणी दिवाण म्हणून काम करीत असतं.

करमचंद गांधी यांची चार लग्न झाली होती, त्यातील पुतळाबाई या करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी होत्या. त्याकाळी, आताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उपलब्ध असलेले दवाखाने नव्हते, त्यामुळे करमचंद गांधी यांच्या आधीच्या तीन पत्नींचे प्रसूतीदरम्यानच निधन झाले होते. त्यामुळे, त्यांनी चौथे लग्न महात्मा गांधीजींच्या मातोश्री म्हणजेच पुतळाबाई यांच्यासोबत केले होते.

करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी पुतळाबाई या महात्मा गांधी यांच्या आई होत. पुतळाबाई या खूपच धार्मिक वृत्तीच्या होत्या, त्या सतत उपवास करीत असतं.

पुतळाबाईंनी महात्मा गांधीजींच्या मनावर बालवयात केलेल्या धार्मिक संस्कारांचा प्रभाव आपणा सर्वांना त्यांच्या पुढील जीवनात झालेला दिसून येतो. मोहनदास करमचंद गांधी यांच्या मनावर त्यांच्या मातोश्रींनी त्यांच्या बालपणीच अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता यांसारख्या तत्वांचे बीज रुजवले होते.

शिवाय, प्राणिमात्रांवर दया करणे, त्यांच्यावर करुणा दाखवणे, गरजूंना मदत करणे आणि स्त्रियांचा आदर करणे, यासारखे अनेक संस्कार गांधीजींच्या मनावर त्यांच्या आईकडूनच गिरवण्यात आले होते. महात्मा गांधीजींच्या लहानपणी त्यांच्या आई पुतळाबाई त्यांना जैन संकल्प आणि त्यांच्या प्रथांबद्दल माहिती सांगत असतं.

  • नक्की वाचा: स्वातंत्र्य दिनाचे भाषण

यामुळे, लहानपणापासूनच महात्मा गांधीजींना उपवास करण्याची सवय लागली होती. जैन धर्मातील संकल्पांचा आणि प्रथांचा त्यांच्या मनावर खूप मोठा प्रभाव पडला होता.

मित्रांनो, महात्मा गांधीजी एक गोष्ट स्वत: कबूल करतात की, पौराणिक कथेतील श्रावणबाळ आणि राजा हरीश्चंद्र या दोन कथांतील व्यक्तीमत्वांचा त्यांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडला होता. स्वातंत्र्य पूर्व काळात आपल्या भारत देशामध्ये  बालविवाह करण्याची प्रथा अस्तित्वात होती.

त्या प्रथेनुसार महात्मा गांधी यांचा विवाह इ.स. १८३३ साली वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी असताना, ‘कस्तूरबा माखनजी कपाडिया’ यांच्यासोबत झाला होता. गांधीजी त्यांना प्रेमाने “बा” असे म्हणत. लग्नानंतर महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी या प्रथेप्रमाणे बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच राहिल्या.

यामुळे, महात्मा गांधी यांच्या शालेय शिक्षणात एक वर्षाचा खंड पडला होता. इ.स. १८८५ साली महात्मा गांधीजी फक्त पंधरा वर्षांचे असताना, त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याचवर्षी महात्मा गांधीजींना एक अपत्य देखील झाले होते. परंतु, ते जास्त काळ जगू शकले नाही.

यानंतर महात्मा गांधी यांना चार मुले झाली. ती पुढीलप्रमाणे; इ.स. १८८८ साली हरीलाल, इ.स. १८९२ साली मणिलाल, इ.स. १८९७ साली रामदास आणि इ.स. १९०० साली देवदास. महात्मा गांधी यांची लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती. परंतु, त्यांच्या वडिलांची त्यांना सरकारी नोकरीत दाखल करण्याची इच्छा होती.

त्यामुळे, इसवी सन १९८८ साली आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महात्मा गांधीजी उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला गेले. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी ‘इनर टेंपल’ या गावी राहून, भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा भरपूर अभ्यास केला. अशा प्रकारे, महात्मा गांधीजींनी लंडनच्या  विद्यापीठामधून आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.

वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, महात्मा गांधीजी इंग्लंडमध्ये गेले होते, तिथे त्यांना इंग्लंड देशाचे सर्व रीतीरिवाज समजून घेण्यात काही वेळ लागला.

खरंतर मित्रांनो, इंग्लंडमध्ये सर्व पदार्थ मांसाहारी मिळत असल्याने, महात्मा गांधीजींना शाकाहारी पदार्थ जेवायला मिळेपर्यंत उपाशी राहावं लागतं असे. महात्मा गांधीजी हे आपल्या आईला दिलेल्या वचनाशी कटीबद्ध असल्याने, त्यांनी त्या ठिकाणी मांसाहार, मद्यपान करणे वर्ज्य केले. त्याठिकाणी त्यांनी शाकाहारी माणसे शोधली आणि त्यांची एक संघटना स्थापन केली.

अशा पद्धतीने, महात्मा गांधीजी स्वतः त्या संघटनेचे अध्यक्ष बनले. महात्मा गांधीजी लंडनमध्ये ज्या शाकाहारी लोकांना भेटले होते, त्यातील काही लोक हे ‘थीयोसोफिकल सोसायटी’ चे सदस्य देखील होते.

महात्मा गांधीजींनी  त्याठिकाणी राहून तेथील चालीरीती शिकण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, बापू बॅरिस्टर बनून सन १८९१ साली आपल्या भारत देशात परत आले आणि भारतात  आल्यानंतर ते वकिली करू लागले.

  • नक्की वाचा: शिक्षक दिनाचे भाषण

ज्यावेळी त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली होती, त्यावेळी त्यांना न्यायादिशासमोर एखादा मुद्दा मांडणे म्हणजे खूप कठीण वाटत होते. मित्रहो, सुरुवातीला त्यांना वकिलाचे हे काम अजिबात जमत नव्हते. बापू आपल्या लाजाळू वृत्तीच्या स्वभावामुळे कोर्टात कुणाशीही फार बोलत देखील नसत.

सन १८९३ साली वयाच्या २४ व्या वर्षी महात्मा गांधी हे भारतीय व्यावसायिकांचे न्यायालयीन सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले होते. मित्रांनो, त्याकाळी दक्षिण आफ्रिका ही एक इंग्रजांची वसाहत होती. त्याठिकाणी कार्य करण्यासाठी महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्याची २१ वर्षे घालविली.

दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना आपल्या प्रिय महात्मा  गांधीजींनी आपले राजकीय दृष्टीकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व अशा त्यांनी स्वतःतील अनेक कौशल्यांचे बारकाईने धडे गिरविले. महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत असताना, समाजात अस्तित्वात असलेल्या विकलांगपणाची जाणीव झाली.

भारतीय संस्कृती आणि धर्म यामध्ये असणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्येपासून आपण भरपूर दूर आहोत याची जाणीव त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये झाल्यानंतर, त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये राहून भारतीय लोकांचे प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेत उद्योग, व्यवसाय आणि इतर कामधंद्यासाठी त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या भारतीय लोकांचे प्रश्न समजावून घेवून त्यांचे निराकरण करण्याचा गांधीजींनी आपला प्रयत्न सुरू केला.

खरंतर मित्रहो, आपल्या बापूंची अशी धारणा होती की; अशा पद्धतीने जर आपण भारतवासियांचे प्रश्न समजावून घेतले, तरच आपण खऱ्या दृष्टीने भारत देशाला समजून घेऊ. पण, याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींना गंभीरपणे वांशिक वर्ण भेदाचा सामना देखील करावा लागला.

त्याठिकाणी भारतीय लोकांना देण्यात येणारी अपमान जनक वागणूक त्यांनी स्वतः अनुभवली. एके दिवशी महात्मा गांधीजी रेल्वेचा प्रवास करीत असताना, त्यांच्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट असताना सुद्धा त्यांना ‘पीटर मारित्झबर्ग’ येथील रेल्वे स्थानकावर एका रेल्वे अधिकाऱ्याने खाली उतरवले आणि महात्मा गांधीजींना तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले होते.

यावेळी, महात्मा गांधीजींनी तिसऱ्या वर्गाच्या रेल्वेच्या डब्यात स्वतः बसण्यास त्या अधिकाऱ्याला  नकार दिला. तेंव्हा, त्या अधिकाऱ्याने गांधीजींना गाडी बाहेर ढकलून दिले आणि जोरदार ढकल्याने गांधीजी रेल्वेच्या खाली पडले. मित्रांनो, त्यादिवशी आपल्या बापूंनी संपूर्ण रात्र फलाटावर काढली होती.

  • नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराज भाषण 

बापूंच्या मनात आलं असत तर ते त्या इंग्रज अधिकाऱ्याला धडा शिकवू शकले असते. परंतु, सुडाच्या भावनेतून कोणाला शिक्षा करणे असा त्यांचा कधीच हेतू नव्हता. आपले महात्मा गांधीजी हे अहिंसावादी असल्याने,  केवळ अन्यायकारक व्यवस्था बदलणे हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीजींना अशा अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

शिवाय, त्यांना त्याठिकाणी असणाऱ्या समाजातील अनेक मुळ समस्येंचा देखील अनुभव आला होता. उदाहरणार्थ, प्रवाशांना वाट काढून न दिल्यामुळे, महात्मा गांधीजी यांना मार देण्यात आला होता.

गांधीजी हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना, त्यांना हॉटेलमधून देखील बाहेर काढून देण्यात आलं होत. याशिवाय, महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतील ‘डर्बन’ या शहरात वकिली करीत असताना, त्यांना तेथील न्यायाधीशांनी डोक्यावरील टोपी काढून ठेवण्याचा आदेश दिला होता. परंतु, आपल्या बापूंनी यावेळी सुध्दा न्यायाधीशाचा आदेश अमान्य केला.

अश्या प्रकारचे अनेक अनुभव आपल्या पाठीशी घेतल्यानंतर, महात्मा गांधीजींनी एक सामाजिक नागरिक म्हणून ब्रिटीश राज्यातील आपल्या लोकांच्या समस्यांविषयी प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. भारतीय लोकांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि आपलं स्वतःचं सामाजिक स्थान निर्माण करण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला.

गांधीजींच्या मनात असे विचार चालू असताना, सन १९०६ साली मात्र ब्रिटीश सरकारने दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू केला.

त्यावेळी बापूंनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आपलं तेथील मुक्काम वाढवलं आणि भारतीय नागरिकांना राजकीय व सामाजिक हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देखील दिली. त्याचबरोबर, गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेच्या ब्रिटीश सरकारकडे भारतीय लोकांच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला.

मित्रांनो यावेळेस, आपल्या बापूंनी आपल्या अहिंसेच्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग केला होता. सन १८९४ साली त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वेगवेगळ्या समाजात विखुरलेल्या भारतीय नागरिकांना एकत्रित करून ‘नाताळ भारतीय कॉन्ग्रेस‘ नावाचा एक राजकीय पक्ष देखील स्थापन केला.

यानंतर, सन ९ जानेवारी १९१५ साली काँग्रेसचे उदारमतवादी नेता “ गोपाळ कृष्ण गोखले ” यांच्या सल्ल्याने महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून आपल्या मायदेशी परत आले. खरंतर मित्रहो, महात्मा गांधीजी “गोपाळ कृष्ण गोखले” यांना आपले राजकीय गुरु मानत असतं.

ज्यावेळी महात्मा गांधीजी भारतात परत आले होते, त्यावेळी त्यांनी स्वतःची राष्ट्रवादी नेता, तसेच संयोजक आणि संघटक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर  ख्याती मिळवली होती. आपल्या राजकीय कार्याला सुरुवात करण्याच्या प्रारंभी महात्मा गांधीजी  यांच्या मनावर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संयम, संतुलन आणि कोणत्याही व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करणे, यासारख्या विचारांचा प्रभाव पडला होता.

मित्रहो, गोपाळ कृष्ण गोखले हे त्यावेळेला “भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे” अध्यक्ष होते. भारत देशात परत आल्यानंतर महात्मा गांधीजी देशाच्या विविध भागात जावून तेथील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. शिवाय, आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांचे दु:ख आणि दारिद्र्य पाहून महात्मा गांधीजी हे स्वतः देखील दु:खी झाले होते.

अहमदाबाद जवळील साबरमती नदीच्या काठी असलेल्या एका आश्रमात महात्मा गांधीजी  वास्तव्य करू लागले.

“साबरमतीचे संत तुम्ही महान, सत्य-अहिंसेचे शस्त्र तुम्ही आम्हांला दिले छान. सर्व जगी अहिंसेचे पुजारी म्हणून, ठेवू आम्ही पहिला तुमचा मान!”

भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांनी अहिंसावादी सत्याग्रह करण्याचे एक नवीन अभिनव तंत्र स्वतःच्या अंगी अंगिकारले. महात्मा गांधीजी हे अहिंसेचे पुजारी असल्याने इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी असहकार, अहिंसा आणि शांततामय या तीन तत्वांचा आपल्यामध्ये अवलंब केला होता.

सन १९१९ साली पंजाबमधील जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणामुळे देशातील लोकांच्या मनात इंग्रज सरकारबद्दल क्रोधाचा भडका उडाला होता. त्यामुळे, या घटनेच्या निषेधार्थ भारत देशात जागोजागी मोर्चे निघाले होते आणि ते मोर्चे दडपून काढण्यासाठी इंग्रज सरकारला खूप दमछाक देखील करावी लागली होती.

  • नक्की वाचा: राजमाता जिजाऊ भाषण मराठी

अशावेळी, महात्मा गांधीजी यांनी जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणी इंग्रज सरकारचा निषेध केला. खरंतर मित्रांनो, सहकार चळवळ सुरु करण्यामागे महात्मा गांधीजींचा असा हेतू होता की, भारतातील ब्रिटीशांचे राज्य हे केवळ भारतातील लोकांच्या सहकार्यावर अबलंबून आहे;

त्यामुळे, जर भारतीयांनी त्यांना विरोध केला तरच त्यांचे शासन पूर्णपणे ढासळून जाईल. मित्रहो, अशा हेतूने महात्मा गांधीजींनी जनतेला आपल्या असहकार आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले. असहकार आंदोलन सुरू असताना, सन १९२० साली  लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय सभेचे संपूर्ण नेतृत्व महात्मा गांधीजी यांच्याकडे आले.

अशा प्रकारे, असहकार चळवळीनुसार आपल्या देशातील नागरिकांनी शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा आणि महाविद्यालये यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मित्रहो, असे केल्याने इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य देण्याबाबत काही पाऊले उचलतील; असे आपल्या  राष्ट्रीय सभेच्या सदस्यांना वाटत होते.

परंतु, गांधीजींचे हे आंदोलन फार काळ टिकू शकले नाही. सन १९२२ साली उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपुर जिल्हाच्या चौरीचौरा या भागात एका शांततापूर्ण चाललेल्या मिरवणुकीवर पोलीसांनी गोळीबार केला.

पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे असहकार चळवळीत सहभागी असलेल्या नागरिकांना खूप राग आला आणि या रागातच घडलेल्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी तेथील एक पोलीस चौकी जाळून टाकली. या जाळपोळीत एक पोलीस अधिकारी व २२ पोलीस ठार झाले. या घटनेची माहिती जेंव्हा बापूंना समजली, तेंव्हा  त्यांना खुप वाईट वाटलं आणि ते एकदम अस्वस्थ झाले.

गांधीजींना वाटू लागलं की, आपण असहकार आंदोलन सुरु करून लोकांना अहिंसेच्या मार्गावर चालायला लावलं. परंतु, अहिंसेच्या मार्गावर चालणे इतक सोप नाही शिवाय, तसे करणे सर्वांनाच शक्य होणार नाही, म्हणून महात्मा गांधी यांनी आपली असहकार चळवळ मागे घेतली. मित्रहो, याशिवाय सन १९१८ साली गुजरातमधील खेडा या गावात सतत पडलेल्या पावसामुळे संपूर्ण गाव हे दुष्काळग्रस्त झालं होत. तेथील पिकांची अवस्था खूपच वाईट होती.

खेडा या गावात अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा इंग्रज सरकार मात्र भारतीय शेतकऱ्यांकडून सक्तीने शेतसारा वसूल करीत होते. परिणामी, या सगळ्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अजुन खूप बिकट, गुंतागुंतीची आणि वाईट बनली. अशावेळी, महात्मा गांधीजींनी त्याठिकाणी राहत असणाऱ्या लोकांसाठी एक आश्रम उभारला आणि आपल्या लहान मोठ्या सर्व अनुयायांना एकत्रित केलं.

याशिवाय, महात्मा गांधीजींनी गावातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आपल्या विश्वासात घेतले. शेतकऱ्यांना महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांकडे यावेळी शेतसारा न भरण्याचा आदेश दिला, तेंव्हा सन १९१८ साली शेतकऱ्यांनी शेतसारा बंदीची चळवळ सुरु केली आणि महात्मा गांधीजींना या चळवळीचे अध्यक्ष बनवले.

महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांनी येथील  शेतकऱ्यांच्या समस्येसंबंधी इंग्रज सरकारसोबत चर्चा केली.

शेवटी, ब्रिटीश सरकारने त्यांची मागणी मान्य करून, तुरुंगात कैद्य केलेल्या सर्व लोकांची सुटका केली. या चळवळीमुळे महात्मा गांधीजींची प्रसिद्धी संपूर्ण जगभर पसरली होती. याशिवाय, इसवी सन  १९१४ साली झालेल्या पहिल्या महायुद्धानंतर आपल्या भारत देशात खूप महागाई वाढली होती आणि या वाढलेल्या महागाईत अहमदाबाद येथील कामगारांनी वेतनवाढीकरीता गिरणी मालकांकडे विनंती केली.

परंतु, कामगारांची ही मागणी मान्य करण्यात आली नाही. यावेळी, महात्मा गांधीजींनी स्वतः त्याठिकाणी जावून संप पुकारला आणि तिथे ते उपोषणाला बसले. महात्मा गांधीजींसोबत गिरणी कामगार देखील उपोषणाला बसले होते. शेवटी, महात्मा गांधीजींच्या या अहिंसावादी आंदोलनासमोर गिरणी मालकांनी हार पत्करली आणि गिरणी कामगारांना वेतनवाढ दिली.

पण मित्रांनो, अशा या थोर आणि जागृत विचारवंताचा मृत्यू मात्र खूप भयानक पद्धतीने आणि अनपेक्षितपणे झाला.

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजी दिल्ली येथील बिर्ला बागेत आपल्या सहकाऱ्यांसोबत फिरत असताना ‘नथुराम गोडसे’ या व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. महात्मा गांधीजी यांना गोळी लागताच ते जमिनीवर कोसळले. मित्रहो, गांधीजींच्या मृत्यूबद्दल लोकांची अशी धारणा आहे की, महात्मा गांधीजी यांनी मृत्युपूर्वी आपल्या मुखातून ‘हे राम’ असे उद्गार काढले होते.

सन १९४९ साली महात्मा गांधीजींच्या मारेकऱ्याला आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यात आले व त्यांच्यावर खटला देखील चालविण्यात आला. भारत सरकारने आपल्या कायद्यानुसार नथुराम गोडसे या खूनीला आणि त्यांच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्याचे ठरवले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि निवारण्यासाठी, जातीभेदेची दरी कमी करण्यासाठी या महामानवाने खरच खूप मोलाची कामगिरी केली होती. म्हणूनच, आपल्या भारत देशात आज सुद्धा भारतीय जनतेच्या मनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याबद्दल भरपूर आदर आहे.

खरंतर, महात्मा गांधीजींनी केलेल्या या उत्कृष्ठ  कामगिरीबद्दल महात्मा गांधीजी हे फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण विश्वात देखील ओळखले जातात. म्हणूनच मित्रांनो, केवळ भारत देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आदर्शवादी असणाऱ्या महात्मा गांधीजींचा जन्मदिन हा सगळीकडे अहिंसादिन म्हणून साजरा केला जातो. अशा या महान राष्ट्रपित्याला माझा कोटी कोटी प्रणाम! जय हिंद! जय भारत!

“ज्यांनी लिहीली, पारतंत्र्य मुक्तीची गाथा. त्या राष्ट्रपित्याच्या, चरणी ठेविते आज माथा!”

– तेजल तानाजी पाटील

बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या mahatma gandhi speech in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “महात्मा गांधी भाषण मराठी” speech on mahatma gandhi in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mahatma gandhi jayanti speech in marathi   या mahatma gandhi bhashan marathi article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mahatma gandhi marathi bhashan माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण mahatma gandhi bhashan marathi madhe या लेखाचा वापर mahatma gandhi information in marathi speech असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

मराठी झटका

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Speech In Marathi Language

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Speech In Marathi Language – मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त, 2 ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. आपल्या देशात हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून पाळला जातो. 2 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधींच्या जन्माला 154 वर्षे पूर्ण होत आहेत. गांधी जयंतीच्या निमित्ताने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उपक्रमांचे नियोजन केले जाते. शाळांमधील विद्यार्थी गांधी जयंती भाषणात, निबंध आणि पोस्टर बनवण्याच्या कार्यक्रमात भाग घेतात.

आज आम्ही आपल्यासाठी महात्मा गांधी जयंतीबद्दल केल्या जाणाऱ्या भाषणासाठी, महत्वाची माहिती देत आहोत.

Table of Contents

महात्मा गांधी भाषण मराठी | Mahatma Gandhi Speech In Marathi Language

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी
2 ऑक्टोबर 2023
गांधीजींची जयंती
भारत

महात्मा गांधींवर भाषण लिहिण्यासाठी आणि ते सुंदरपणे सादर करण्यासाठी काय करावे ? आपल्या भाषणात कोणते तपशील जोडायचे? यासाठी मदत होईल अशी माहिती आम्ही देत आहोत

शालेय विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीसाठी भाषण का तयार करावे ?

महात्मा गांधींनी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अहिंसक दृष्टीकोन निवडल्यापासून “भारताचे राष्ट्रपिता” हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे 2 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून नियुक्त केला जातो. गांधीजींचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

भारतात, गांधी जयंती ही राष्ट्रीय सुट्टी आहे जी देशभक्ती आणि राष्ट्रवादाच्या भावनेने साजरी केली जाते. संपूर्ण भारतात, स्वातंत्र्य चळवळीच्या या महान नेत्याची तत्त्वे आणि रणनीती यांच्या स्मरणार्थ लोक गांधी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतात. विशेषतः महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी महात्मा गांधी जयंती साजरी करणे खूप महत्वाचे आहे.

मी माझे गांधी जयंती भाषण कसे सुरू करू शकतो?

  • तुमचे गांधी जयंती भाषण सुरू करण्यासाठी तुमच्या श्रोत्यांना “नमस्कार,” “गुड मॉर्निंग,” “शुभ दुपार,” किंवा “शुभ संध्याकाळ” म्हणा.
  • श्रोत्यांचे लक्ष लगेच वेधून घेण्यासाठी एका संस्मरणीय म्हणीने किंवा महात्मा गांधीच्या अवतरणाने तुमचे भाषण सुरू करा.
  • तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असल्याचे लक्षात ठेवा.
  • तुमच्या देहबोलीत उत्साही राहा. डोलू नका, थरथरू नका किंवा स्थिर राहू नका. योग्य पवित्रा ठेवा आणि ताठ उभे रहा.
  • भाषण करताना गरज असल्यास, योग्य ते हावभाव चेहऱ्यावर उमटू द्या.

माझे गांधी जयंती भाषण किती वेळचे असावे?

  • आपल्याला भाषणसाठी दिलेल्या वेळेतच भाषण पूर्ण करा.
  • भाषणासाठी वेळ कमी असेल तर महत्वाच्या मुद्यांची योग्य मांडणी करा.
  • भाषणासाठी वेळ जर जास्त दिलेला असेल तर महात्मा गांधीजींच्या आयुष्यातील, त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील काही महत्वाचे प्रसंग सविस्तर वर्णन करून सांगा.
  • अकारण भाषण लांबवू नका किंवा उगाचच पटकन संपवूही नका

मी माझ्या गांधी जयंती भाषणाचा समारोप कसा करावा ?

  • भाषण संपवताना महात्मा गांधीजींची थोर वाचने, तत्वे सांगा
  • त्यांनी भारतातील जनतेला दिलेली मार्ग दर्शक तत्वे सांगा.
  • महात्मा गांधीजींच्या आयुष्यचा आणि तत्वांचा जनमानसावरील प्रभाव स्पष्ट कारा.
  • महात्मा गांधींवरील या भाषणांमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे जीवन आणि त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष समजून घेण्यास मदत होईल.
  • महात्मा गांधींचे संपूर्ण जीवन येथील प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहे.

Mahatma Gandhi Speech In Marathi Language

महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण मराठी | Mahatma Gandhi Jayanti Bhashan Marathi – भाषण क्र. 1

नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात, सर्वांना!’ आदरणीय प्राचार्य महोदय, येथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि प्रिय विद्यार्थीहो, आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. मोठ्या अभिमानाने आणि सन्मानाने मला आपल्या राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्याबद्दल काही शब्द सांगायचे आहेत.

मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर, गुजरात येथे झाला. ते पोरबंदरचे मुख्यमंत्री करमचंद गांधी यांचे पुत्र होते आणि त्यांच्या आईचे नाव पुतलीबाई होते. ते अतिशय धार्मिक पार्श्वभूमीत वाढले होते आणि सुरुवातीपासूनच त्यांना स्वयं-शिस्त आणि अहिंसेचे महत्त्व शिकवले गेले. महात्मा गांधींच्या आई पुतिलबाईंनी त्यांना जीवनातील अनेक महत्त्वाचे गुण शिकवले, ज्याचे महात्मा गांधींनी मनापासून पालन केले.

👉 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची संपूर्ण माहिती  

वयाच्या 19 व्या वर्षी गांधींनी लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आपले घर सोडले. वेळ निघून गेली आणि 1891 मध्ये त्यांनी बॉम्बे कोर्टात वकिली सुरू केली. त्यांना यश मिळाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय कंपनीचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी संपर्क करण्यात आला. पत्नी कस्तुरबाई आणि मुलांसोबत ते जवळपास २० वर्षे दक्षिण आफ्रिकेत राहिले.

तुम्ही विचार करत असाल- देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना लढा दिला त्याचे परिणाम काय झाले? तर त्यांच्या कृतीतून आपल्याला शिकायला मिळणारे धडे मी इथे सुरू करतो- ‘आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन आपले नशीब घडवतो.’ प्रत्येक निर्णयाची एक पार्श्वगाथा असते, आणि म्हणून त्यांनी देशासाठी लढण्याचा निर्णय घेतला.

दक्षिण आफ्रिकेत ते भारतीय स्थलांतरित असल्याने त्यांना खूप भेदभावाला सामोरे जावे लागले. एकदा गांधी रेल्वे प्रवासात असताना एका गोर्‍या ड्रायव्हरने त्यांना मारहाण करून प्रथम श्रेणीच्या डब्यातून बाहेर फेकले कारण त्यांनी एका युरोपियन प्रवाशाला त्यांची जागा सोडण्यास नकार दिला. ही घटना गांधींच्या जीवनातील एक टर्निंग पॉईंट मानली जाते, कारण यामुळे भारतीयांना समाजात कशी वागणूक दिली जाते याचे प्रतिबिंब गांधींच्या जीवनात उमटले.

त्या दिवशी गांधीजींनी लोकांच्या भल्यासाठी चांगला बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला आणि उत्साही नेता कधीही मागे हटला नाही. ते भेदभाव आणि पक्षपाती वागणूक सहन करू शकत नव्हते. त्यांच्या लक्षात आले की त्यांच्यासारखे इतर अनेक लोक देखील अशाच छळातून जात आहेत. त्यामुळे त्यांनी परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्याऐवजी लढण्याचा निर्णय घेतला.

ज्या देशात आपला अपमान होईल अशा देशात राहणे इतर कोणीही निवडणार नाही, परंतु गांधी अन्यायाला तोंड देण्याच्या आणि त्याविरुद्ध लढण्याच्या आपल्या मतावर ठाम होते. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत परत राहण्याचा आणि अशा प्रकारच्या समस्यांना तोंड देत असलेल्या लोकांची सुटका करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला गांधींनी सर्वांना सत्य आणि खंबीरपणा किंवा सत्याग्रह या संकल्पना शिकवण्यास सुरुवात केली. त्यांचा असा विश्वास होता की हिंसा, भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी निष्क्रिय प्रतिकार हा एकमेव मार्ग आहे आणि केवळ निष्क्रिय प्रतिकारानेच स्वातंत्र्य मिळू शकते.

जुलै 1914 मध्ये, दक्षिण आफ्रिकेत जवळपास 20 वर्षे घालवल्यानंतर गांधी भारतात परतले. 1919 मध्ये, गांधींनी रौलेट कायद्याच्या विरोधात निष्क्रिय प्रतिकाराची संघटित मोहीम सुरू केली. ब्रिटीशांच्या नेतृत्वाखालील 400 भारतीय सैनिकांनी केलेला नरसंहार पाहिल्यानंतर त्यांना रौलेट कायद्याविरुद्धची मोहीम मागे घ्यावी लागली. आणि 1919 पर्यंत, ते भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील सर्वात आघाडीचे नेते होते. दक्षिण आफ्रिकेत राहण्याच्या त्याच्या निर्णयाने आपल्या देशाचे नशीब बदलले.

आपल्या देशासाठी त्यांनी केलेल्या अनेक धाडसी प्रयत्नांपैकी एकही व्यर्थ गेला नाही. ब्रिटीश राजवटीच्या विरोधात असंख्य आंदोलने आणि अहिंसक चळवळींच्या प्रयत्नांनंतर, अखेरीस 1947 मध्ये भारताला ब्रिटीशांनी स्वातंत्र्य दिले, परंतु देशाचे 2 वसाहतींमध्ये विभाजन केले: भारत आणि पाकिस्तान. देशाची फाळणी करणाऱ्या या निर्णयाच्या विरोधात गांधीजी होते पण फाळणीनंतर हिंदू आणि मुस्लिमांना अंतर्गत शांतता लाभेल असा विचार करून शेवटी ते सहमत झाले. गांधींनी प्रत्येक परिस्थितीत चांगलेच पाहिले आणि म्हणूनच त्यांना आपल्या राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते.

३० जानेवारी १९४८ रोजी, गांधीजी नवी दिल्लीत संध्याकाळच्या प्रार्थनेतून परतत असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या केली गेली. दुस-या दिवशी लाखो लोकांनी शोक व्यक्त केला आणि पवित्र जुमना नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की अनेक नेत्यांनी आपल्या देशासाठी आपले प्राण का दिले, पण महात्मा गांधी इतके खास कशामुळे? त्याचे नेतृत्वगुण, उल्लेखनीय तत्त्वे, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अविरत समर्पण, मानसिकता आणि बरेच काही या गोष्टी माणसाला संपूर्ण राष्ट्राचा पिता बनवतात. गांधीजींना मिळालेल्या आदराची मर्यादा नाही.

भारतीय या नात्याने आमचे अंतःकरण महात्मा गांधीजींबद्दल आदराने भरलेले आहे. या भाषणाचा समारोप करताना मला असे म्हणायचे आहे की, महात्मा गांधींचे जीवन हे एक खुले पुस्तक आहे ज्यातून अनेक गोष्टी शिकता येतात.

1947 मध्ये फाळणीमुळे दंगली झाल्यामुळे त्यांनी अनेक दिवस उपोषण केले आणि ते थांबवण्याचा त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केला. आजही देशात धर्माच्या नावावर लोक लढत आहेत हे पाहून खूप वाईट वाटते. जर आपण गांधीजींवर वर आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांवर प्रेम आणि आदर करत असू, तर आपण प्रथम भारतीय बनले पाहिजे आणि धर्माच्या नावावर हिंसाचार थांबवला पाहिजे.

महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण मराठी

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Speech In Marathi Language – भाषण क्र. 2

प्रिय मित्रांनो- आजच्या भाषण समारंभात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. सर्वप्रथम, आजच्या कार्यक्रमाला येऊन तो यशस्वी केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. मी विशेषतः माझ्या वरिष्ठांचे आणि सहकारी सदस्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला. जेणेकरून अधिकाधिक लोक आमच्यात सामील होऊन राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव करून देतील.

महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांपैकी एक होते. किंबहुना, त्यांनीच ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व केले. गांधी हे कायद्याचे विद्यार्थी होते, परंतु त्यांनी आपला व्यवसाय सोडला आणि आपल्या राष्ट्रासाठी लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते, “डोळ्याच्या बदल्यात डोळा संपूर्ण जगाला आंधळा बनवेल.” त्यांनी अहिंसेचे पालन केले आणि हिंसा हे प्रत्येक गोष्टीचे उत्तर नाही असा त्यांचा विश्वास होता.

ते म्हणाले, “तुम्ही जगात पाहू इच्छित असा बदल व्हा” आणि त्याने आपल्या जीवनात तेच केले. तो बदल होता. त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी अथक लढा दिला आणि प्रसंगी आपले जीवन पणाला लावले. त्यांनी अनेक चळवळींचे नेतृत्व केले ज्यामुळे त्यांना अनेक वेळा अटक झाली आणि इतर अनेक जीवघेण्या परिस्थिती निर्माण झाल्या.

गांधींना ‘महात्मा’ म्हटले गेले. भारतीयांच्या नजरेत ते एक महान आत्मा होते. त्यांचे अविरत प्रयत्न आणि चिकाटीमुळेच सर्व नेते आणि लोक इंग्रजांच्या विरोधात उभे राहिले. त्यांनी सर्वांना विश्वास दिला की, एकत्रितपणे ते आपला देश जिंकू शकतात.

असे बरेच लोक आहेत ज्यांना आपण आदर्श म्हणून पाहतो. इतिहासातील महान नेत्यांपैकी एक म्हणून महात्मा गांधी निश्चितपणे त्या यादीत असू शकतात. मित्रांनो तुम्हीही त्याच्यासारखा नेता बनणे हीच महत्त्वाकांक्षा ठेवा. आव्हानांसामोर उभे राहण्यासाठी, पहिला फटका घ्या आणि भविष्यातील नेते होण्यासाठी मार्ग प्रशस्त करणारे अनुकरणीय जीवन जगा.

गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Speech In Marathi Language – भाषण क्र. 3

आदरणीय प्राचार्य महोदय, येथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि प्रिय विद्यार्थीहो, आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.

आज, 2 ऑक्टोबर रोजी, गांधी जयंती निमित्त, मला खूप आनंद होत आहे की मला आपल्या आदर्श महात्मा गांधींबद्दलचे माझे विचार आपल्या सर्वांसमोर मांडण्याची संधी मिळत आहे.

जेव्हा आपण राष्ट्रीय एकात्मतेबद्दल बोलतो तेव्हा मला प्रथम त्या व्यक्तीबद्दल बोलायचे आहे ज्याने आपल्या स्वातंत्र्याबरोबरच आपल्या समाजातून जात, वर्ग आणि लिंगाच्या आधारावर भेदभाव यांसारख्या अनेक प्रकारच्या दुष्कृत्यांचे उच्चाटन करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. होते.

ते दुसरे कोणी नसून आमचे राष्ट्रपिता महात्मा गांधी होते. ज्यांनी भारताच्या अनेक स्वातंत्र्यलढ्यांमध्ये आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडली. त्यांनी लाखो लोकांना इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्याच्या लढाईत सामील होण्याची प्रेरणा दिली आणि या एकत्रित प्रयत्नांमुळे इंग्रजांना आम्हाला स्वातंत्र्य देणे भाग पडले, जो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे तसेच आमचा मूलभूत अधिकार आहे.

चला तर मग जाणून घेऊया त्यांनी केलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी

दलित आणि अस्पृश्यांसाठी संघर्ष

8 मे 1933 चा तो दिवस होता, जेव्हा गांधीजींनी आत्मशुद्धीसाठी 21 दिवसांचे उपोषण केले होते, त्यासोबतच त्यांनी दलित आणि अस्पृश्यांच्या समर्थनार्थ एक वर्ष चळवळ सुरू केली आणि त्यांना हरिजन म्हणून संबोधले. गांधीजींचा जन्म समृद्ध आणि उच्चवर्णीय कुटुंबात झाला असला तरी त्यांनी आयुष्यभर दलित आणि अस्पृश्यांच्या हक्कांसाठी आणि उन्नतीसाठी काम केले.

भारत छोडो आंदोलन

ब्रिटीश राजवट उलथून टाकण्यासाठी महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी ऐतिहासिक भारत छोडो आंदोलनाची हाक दिली. जी अतिशय प्रभावी मोहीम ठरली. आपल्या चळवळीतही त्यांनी सत्य आणि अहिंसेचा आधार घेतला.

असहकार आंदोलन

बरं, असहकार चळवळ कोणाला माहीत नाही, ती गांधीजींनी सुरू केलेल्या प्रसिद्ध चळवळींपैकी एक आहे. या चळवळीने गांधीजींना लोकांसमोर महानायक म्हणून सादर केले. जालियनवाला बंग हत्याकांडाच्या निषेधार्थ सुरू झालेले हे देशव्यापी आंदोलन होते. ज्यात अमृतसरमध्ये शेकडो नि:शस्त्र आणि निष्पाप लोक ब्रिटिश सैनिकांनी मारले.

खिलाफत चळवळ

इंग्रजांनी खलिफाला (मुस्लिम धर्मातील सर्वोच्च धार्मिक पद) हटवल्याच्या निषेधार्थ गांधीजींनी मुस्लिमांना पाठिंबा देत 1919 मध्ये खिलाफत चळवळीची घोषणा केली, ज्यामुळे ते मुस्लिमांमध्ये खूप प्रसिद्ध झाले आणि सर्वात प्रसिद्ध नेते बनले. भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशाचा. लोकप्रिय वक्ता आणि नायक बनले.

दांडी मार्च

गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध चालवलेल्या सर्वात लोकप्रिय आंदोलनांपैकी एक दांडी यात्रा होती. इंग्रजांनी आपल्या देशात मिठावर लादलेल्या कराच्या निषेधार्थ गांधीजींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन १२ मार्च ते ६ एप्रिल १९३० पर्यंत चालले, ज्यामध्ये त्यांनी आपल्या समर्थकांसह अहमदाबाद ते गुजरातमधील दांडीपर्यंत ३८८ किलोमीटर पायी कूच केली. आणि दांडीला पोहोचल्यानंतर स्वतः मीठ हातात घेऊन या कायद्याला विरोध केला.

महात्मा गांधींनी आपल्या विचारांनी आणि तत्त्वांनी संपूर्ण जगावर प्रभाव टाकला आणि त्यामुळेच ते एक महान व्यक्तिमत्व म्हणून भारतातच नव्हे तर जगभरात स्मरणात आहेत.

Gandhi Jayanti Short Speech In Marathi

गांधी जयंती लहान भाषण मराठी | Gandhi Jayanti Short Speech In Marathi – भाषण क्र. 4

बालमित्रांनो, आज आपण आपले राष्ट्रपिता आणि आपल्या सर्वांच्या अंतःकरणात सदैव आदरणीय असलेल्या बापुजींना एक छोटीशी श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो आहोत. आपण 2 ऑक्टोबर 2023 रोजी भारताच्या स्वातंत्र्याचे मुक्ती योद्धा आणि नेते महात्मा गांधी यांचे स्मरण करतो, हा दिवस गांधी जयंती म्हणून ओळखला जातो. 

आपले बापुजी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर, गुजरात येथे झाला. ते पोरबंदरचे मुख्यमंत्री करमचंद गांधी यांचे पुत्र होते आणि त्यांच्या आईचे नाव पुतलीबाई होते.

मोहनदास यांचे अतिशय धार्मिक पार्श्वभूमीत संगोपन झाले होते आणि सुरुवातीपासूनच त्याना आत्म-शिस्त आणि अहिंसेचे मूल्य शिकवले गेले होते. म्हणून, यावरूनच आपल्याला कळते की गांधींना त्यांचे गुण त्यांच्या आईकडून मिळाले.

देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे, सर्वांना सत्य आणि अहिंसेच्या मार्ग दाखवणारे गांधीजी, अर्थात महात्मा गांधी यांना देशाचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा गांधी या नावाने ओळखले जाते. गांधीजी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे योगदान दिले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली.

त्यांनी भारताच्या स्वातंत्र्या साठी विविध आंदोलने केली, ज्यातसामुदायिक उपोषण हा मार्ग सुद्धा होता. हिंसेशिवाय न्याय मिळू शकतो, हे त्यांनी यश मिळवल्यानंतर जगाला दाखवून दिले. या महान नेत्याने उचललेले प्रत्येक पाऊल आपल्याला एक मौल्यवान धडा शिकवते. ते आज आपल्यासोबत नसले, तरीही आपल्याजवळ त्याची प्रशंसनीय तत्त्वे नक्कीच आहेत, जी आपल्याला जीवनातील कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करतील.

शेवटी, 1947 मध्ये, ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिले परंतु देशाची 2 वसाहतींमध्ये विभागणी केली: भारत आणि पाकिस्तान. गांधी फाळणीच्या विरोधात होते. 30 जानेवारी 1948 रोजी, गांधीजी नवी दिल्लीत संध्याकाळच्या प्रार्थनेवरून परतत असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या केली गेली.

भारताच्या मुक्ती चळवळीत त्यांचे योगदान मोलाचे होते. दांडी मार्च, भारत छोडो आंदोलन, असहकार आंदोलन इत्यादींचे नेतृत्व त्यांनी केले. आज त्यांचे आभार मानण्याची आणि चांगले जीवन जगण्याची आणखी एक आठवण आहे. आपण सर्वजण एका वेळी एक दिवस अधिक अर्थपूर्ण जगण्याचा प्रयत्न करू शकतो.

वयाच्या 19 व्या वर्षी, गांधींनी लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी त्यांचे घर सोडले आणि 1891 मध्ये त्यांना दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय कंपनीचे प्रतिनिधीत्व करण्यास सांगितले गेले. त्यांची पत्नी, कस्तुरबा आणि त्यांच्या मुलांसह, गांधी जवळजवळ 20 वर्षे दक्षिण आफ्रिकेत राहिले. दक्षिण आफ्रिकेत भारतीय स्थलांतरित असल्याने त्यांना खूप वर्णभेदभावाला सामोरे जावे लागले.

महात्मा गांधी भाषण मराठी 10 ओळी | Mahatma Gandhi Speech In Marathi Language 10 Lines

  • 2 ऑक्टोबर 1869 रोजी महात्मा गांधींचा जन्मदिवस गांधी जयंती साजरी केली जाते.
  • समस्या सोडवण्यासाठी संघर्ष आणि हिंसा आवश्यक नाही, हे त्यांनी आम्हाला दाखवून दिले.
  • आमच्याकडे आधीच असलेल्या गोष्टींवर आनंदी राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.
  • गांधीजी हे साधेपणाने जीवन जगले. ते अतिशय साधे कपडे परिधान करत होते.
  • त्यांनी आम्हाला “सत्याग्रह” किंवा सत्याच्या सामर्थ्याबद्दल देखील शिकवले.
  • नेहमी सत्य बोला, इतरांशी सौजन्याने वागा आणि प्रामाणिक, सरळ जीवन जगा, असे त्यांचे तत्वज्ञान होते.
  • गांधीजी हे एक अद्भुत नेते होते ज्यांनी अहिंसेचे समर्थन केले, अहिंसा तत्वज्ञान आज जगभरात वंदनीय मानले जाते.
  • आपणही आपले राष्ट्र सुधारण्यासाठी, त्यांनी दिलेल्या मार्गाने चालले पाहिजे.
  • आम्ही या दिवशी त्यांच्या साधेपणा, प्रेम आणि सत्याच्या धड्यांचा सन्मान करतो.
  • सत्य बोलणे महत्त्वाचे असते आणि समाजात परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती असते.
  • आम्ही आजही त्याच्या अहिंसक आणि शांततापूर्ण विश्वासाने प्रेरित आहोत.
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ते एक प्रमुख नेते होते.

Gandhi Jayanti Short Speech In Marathi

भाषणात वापरण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार | Mahatma Gandhi Thoughts In Marathi

आपले भाषण सुंदर व आलंकारिक बनविण्यासाठी आम्ही महात्मा गांधी यांचे विचार आणि तत्वे इथे देत आहोत.

गांधीजींचे अहिंसा विचार | Best Gandhi Thoughts In Marathi

  • जिथे प्रेम आहे तिथेच खरे जीवन आहे.
  • विनम्रतेने तुम्ही संपूर्ण जगाला हादरवू शकता.
  • अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे.
  • जास्त काम नाही तर काम नसले माणसाला मारत असते.
  • डोळ्यासाठी डोळा संपूर्ण जगाला आंधळे करुन सोडेल.
  • ईश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणा
  • स्वत्व शोधण्याचा सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे स्वत:ला दुसऱ्यांच्या सेवेत झोकून देणे.
  • अहिंसा ही मनुष्याची सर्वात मोठी ताकद आहे. हे जगातील कोणत्याही हत्यारापेक्षा अधिक ताकदवान आहे.
  • विध्वंस हा सर्वंकषतावादाच्या नावाखाली केला गेला की, स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली-(त्यातील) मृतांसाठी, अनाथांसाठी आणि गृहहीनांसाठी काय फरक असणार?
  • अशी अनेक ध्येय आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार होईन, पण असे एकही ध्येय नाही ज्यासाठी मी कोणाचा जीव घेईन.

गांधीचे 10 सर्वोत्तम विचार | Best Gandhi Jayanti Quotes In Marathi

  • क्रोध आणि असहिष्णुता हे खरे शत्रू आहेत.
  • तेव्हाच बोला जेव्हा तुमचे बोलणे मौन धारण करण्यापेक्षा जास्त महत्वाचे असेल.
  • एक चांगली व्यक्ती ही प्रत्येक सजीवाचा चांगला मित्र असते.
  • शक्ती शारिरीक क्षमतेमुळे येत नाही. तर ती तुमच्या ईच्छाशक्तीमुळे येते.
  • माझ्या परवानगीशिवाय मला कोणीही दुखावू शकत नाही.
  • एखादी व्यक्ती केवळ आपल्या विचाराने बनते, जो तो विचार करतो तोच तो बनत असतो.
  • व्यक्तीची ओळख त्याच्या कपड्यावरुन नाही तर त्याच्या चारित्र्यावरुन होते.
  • कमजोर व्यक्ती कधीही माफी मागत नाही. पण क्षमा करणे हे एका ताकदवान व्यक्तीचे विशेष आहे.
  • आनंद तेव्हाच मिळतो. ज्यावेळी तुम्ही जो विचार करता, जे बोलता आणि जे कृतीत आणता.. ते सामंजस्याने केलेले हवे.
  • जेव्हा तुमचा सामना तुमच्या विरोधकांशी होईल.. त्यावेळी त्याला प्रेमाने जिंका.

गांधीजींचे शिक्षणावर आधारीत विचार | Mahatma Gandhi Quotes On Education In Marathi

  • मौन सगळ्यात सशक्त भाषण आहे, हळूहळू लोक तुमचे ऐकायला लागतील.
  • तुम्ही जे काही करत असाल तर इतरांसाठी कदाचित नगण्य आहे पण तुम्ही ते करणे गरजेचे असते.
  • आपल्या ज्ञानावर अधिक विश्वास ठेवणे मुर्खपणा आहे. या गोष्टीची आठवण करुन देणे गरजेचे आहे की, सगळ्या मजबूत कमजोर पडू शकतो आणि हुशार व्यक्तीकडून चुका ही होऊ शकतात.
  • मला देवाकडून मिळाले आहे. ते मी देवाच्या चरणी अर्पण करतो.
  • रोजच्या प्रार्थनेत शब्द नसले तरी चालेल. पण हृदय हवे… कारण हृदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.
  • ज्या व्यक्तीमध्ये विचार करण्याची क्षमता असते. त्या व्यक्तीला शिक्षकाचीही गरज नसते.
  • जर तुम्ही काहीही केले नाही तर तुमच्या आयुष्य जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही.
  • चूक स्विकारणे हे केर काढण्यासारखे आहे. जे तुमचे मन स्वच्छ आणि साफ करते.
  • तुम्ही आज काय करता त्यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे.
  • जर तुम्ही रामासारखे वागू शकत नसाल तर तुमच्या रामायणपठणाला काहीच अर्थ नाही.

महात्मा गांधी बद्दल प्रश्न

महात्मा गांधींच्या प्रसिद्ध ओळी काय आहेत.

येथे गांधींचे काही प्रसिद्ध अवतरण आहेत. “उद्या मरणार असल्यासारखे जगा. असे शिका की जणू तुम्ही कायमचे जगणार आहात.” “तुम्ही जे विचार करता, तुम्ही जे बोलता आणि जे करता ते सुसंगत असेल तेव्हाच आनंद होतो.” “स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वतःला गमावणे.”

गांधीजींचे सर्वात लोकप्रिय कार्य कोणते आहे?

‘द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ’ हे महात्मा गांधींचे सर्वात उल्लेखनीय कार्य आहे. त्यांचे जीवन आणि त्यांच्या अनुभवांची माहिती देणारे हे आत्मचरित्र आहे.

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महात्मा गांधीजी बद्दल माहिती सांगितली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. या लेखात दिलेली Mahatma Gandhi Speech In Marathi Language म्हणजेच महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण मराठी व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

MarathiGyaan - Essay, Speech, Stories and More

महात्मा गांधी मराठी भाषण | Mahatma Gandhi Speech in Marathi | MarathiGyaan

महात्मा गांधी मराठी भाषण - mahatma gandhi speech in marathi.

आज मी तुमच्या करीत लिहले आहे महात्मा गांधी मराठी भाषण (mahatma gandhi speech in marathi) . आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल.हे गांधी जयंती (gandhi jayanti speech in marathi) साठी सर्वोत्तम भाषण आहे.

mahatma gandhi speech in marathi

महात्मा गांधी मराठी भाषण

“ बेष्णव जन तो तेणे कहिए जो पीरपराई जाणेरे..."

महात्माजींच्या बाबतीत हे अगदी शंभर टक्के खरे आहे. म्हणून प्रथमच महात्माजींना; आपल्या * राष्ट्रपित्याला ' त्यांच्या जयंती निमित्त मी शतप्रणाम करुन... त्यांना आदरांजली वाहतो.

इथे उपस्थित माझ्या गुरुजनांना देखील माझे सादर वंदन. माझ्या दोस्तांनो, .

आपल्या हातून रोज नव्या-नव्या चुका होतच असतात. त्यासाठी आपले आई-बाबा, शाळेत शिक्षक आपल्याला वेळीच समज देतात. कधी कधी ( नव्हे बरेचदा ! ) आपल्याला त्यांचा रागही येतो. पण आपण तर सामान्य मुले आहोत. आपण त्यांचे ऐकलेच पाहिजे. कसे ? त्यासाठी महात्माजींच्या बालपणातील दोन घटना सांगतोय. त्यावेळी ते होते एक सामान्य विद्यार्थी, ' मोहनदास करमचंद गांधी. '

शाळेत जाणाऱ्या मोहनदासला शाळेत वाईट मित्रांची संगत लागली. अवघ्या सहाव्या वर्षी खोटे बोलणे, चोरी करणे, विडी ओढणे या वाईट गोष्टी. त्याच्या हातून घडल्या. वडिलांच्या हे लक्षात येताच त्यांनी मोहनला हटकले... खडसावले ! मोहनलाही आपली चूक ध्यानात आली. त्याने बडिलांजवळ झाल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली. पुन्हा असे न करण्याचा “ खरे बोलण्याचा ' निश्चय केला. आणि अभ्यासात स्वत:ला गाढून घेतले.

मग इतके की स्वत:ला लिहिता न येणारा इंग्रजी शब्द ' शेजारच्या मित्राच्या वहीत बघून लिही. ' असे शिक्षकांनी सांगून सुद्धा त्या शब्दाची कॉपी केली नाही: चुकीचे लिहिले. नंतर तो शब्द. त्याचे स्पेलिंग प्रयत्नपूर्वक पाठ करुन मगच आपल्या वहीत उतरवले. ही घटना आहे राजकोट येथील शाळेत ते शिकत असतानाची... आणि ते स्पेलिंग होते ' केटल ' या शब्दाचे. याच निश्चयी व निग्रही स्वभावामुळेच केवळ “ सत्य ' ब ' अहिंसा, या दोन तत्त्वांच्या जोरावर गांधींजींनी अन्यायाविरुद्ध लढा दिला व जुलमी इंग्रज सत्तेला प्रतिकार केला.

वास्तविक पाहता गांधीजींचा जन्म गुजरातमधील * पोरबंदर ' या गावात झाला. वडिल पोरबंदरच्या महाराजांचे दिवाण होते. सारे काही व्यवस्थित होते. मॅट्रिक नंतर पुढील शिक्षणासाठी ते परदेशात गेले. नि बॅरिस्टर होऊनच भारतात परतले. हायकोर्टात ( मुंबईच्या ) वकिली करु लागले. एका. खटल्याच्या निमित्ताने त्यांना दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. आणि ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. दक्षिण आफ्रिकेत भारतीय लोकांवर होणारे अत्याचार, अन्याय त्यांना पाहवले नाहीत. तिथेच त्यांनी यासाठी तेथील भारतीयांना एकत्र केले. त्यांना त्यांच्यावर होत न असलेल्या अन्यायाची जाणीव करुन दिली. त्यासाठी सत्याग्रह पुकारला आणि भारतीयांना देय असलेले न्याय्य हक्क व सवलती मिळवून देऊन मगच भारतात परतले.

भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही हे त्यांच्या लक्षात आले. ब्रिटिश सत्ता भारतातल्या भारतीयांच्या हक्कांवर, स्वातंत्र्यावर गदा आणत . होती. आपले भारतीय जात-पात, स्पृश्य-अस्पृश्य च्या विळख्यात अडकले होते. प्रथम सर्व भारतीयांना मनाने एकत्र आणण्यासाठी हे जाती भेद मिटविण्यासाठी गांधींजींनी प्रयत्न सुरु केले. अस्पृश्यांना ते हरिजन म्हणूनसंबोधत. त्यांना न्याय हक्क, योग्य सामाजिक दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.

सर्व जनता एक करण्यासाठी गांधीजी पदयात्रा काढत. त्यात त्यांच्या पत्नी कस्तुरबाही असत. या दरम्यान गांधीजींच्या लक्षात आली ती भारतातील ठराविक स्तरावरील दारिक्र्यावस्था ! घालायला कपडे नाहीत म्हणून न येणारे उपाशी असलेले 'हे पीडित पाहून; या महात्म्याने प्रतिज्ञा केली “ जोवर देशातील प्रत्येकाला स्वतःच्या अगावर घालायला कपडा नसेल तो वर मी ही केवळ पंचा नेसेन '...' जोवर प्रत्येकाला दोन वेळची रोजी-रोटी मिळणार नाही तोवर मी देखील एकवेळ ( दिवसातून ) उपासच करेन. ' मग त्यांनी या वस्त्यांतून चरखे वाटले. स्वत: सूत कातून त्याचे वस्त्र गुंडाळण्याचा स्वावलंबनाचा आदर्श या लोकांपुढे... आपल्यापुढे ठेवला आणि याच घटनेने ते राष्ट्राचे कैवारी " राष्ट्रपिता ' बनले.

साबरमती नदीकाठी आश्रम बांधून गांधीजी साधेपणाने राहू लागले. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी ' यंग इंडिया ' हे साप्ताहिक चालवीत होते. सत्य, अहिंसा आणि असहकार याच्या बळावरच स्वातंत्र्य मिळावे याचा आग्रह त्यांनी धरला होता.

भारतीय स्वातंत्र्याचा लढा दिवसेंदिवस ऊग्र बनत चालला होता. इंग्रज सरकार आता या लढ्याने त्रासले होते. हेराण झाले होते. याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोलमेज परिषद इंग्लंड येथे भरविण्यात आली होती. गांधीजी त्या परिषदेस हजर होते. तेथेही कणखर आणि स्पष्टपणे त्यांनी भारताची बाजू मांडली. भारतात परत आल्यावर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबईला ब्रिटीश सरकारला “चले जाव “ चा आदेश गांधीजींनी दिला. आणि स्वातंत्र्यलढ्याने आपला अंतिम टप्पा गाठला. यश स्वातंत्र्य आता समोर दिसत होते. स्वातंत्र्य सूर्याची लख्ख किरणे आता भारतावर पडणार होते पण भारतातील हिंदू मुसलमानांचे तंटे काही केल्या मिटत नव्हते. गांधींजींनी हे तंटे मिटविण्यासाठी जिवाचे रान केले पण व्यर्थ.

ब्रिटिशांनी याच संधीचा फायदा घेतला. भारताला स्वातंत्र्य बहाल केले पण त्याची हिंदुस्थान - पाकिस्तान अशी फाळणी करुन. या फाळणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हिंदु-मुसलमान सर्वांवरच अत्याचार झाले. सर्वांचेच खूप नुकसान झाले. गांधींजींचे स्वप्न होते... एकसंघ भारताचे... ते तुटले... गांधीजी व्यथित झाले. .. दुःखी झाले... नोखाली येथे त्यांनी एक शांतियात्रा देखील काढली. मनामनांतील दुवे साधणारा तो एक अखेरचा प्रयत्न होता. स्वातंत्र्यलढ्यात समर्पित जीवन जगणाऱ्या या सेनापतीने शेवट पर्यंत आपली तत्वे सोडली नाहीत. “ सत्याचे प्रयोग ' नावाचे आत्मकथन पुढील पिढीसाठी दिशादर्शक म्हणून त्यांनी लिहून ठेवले.

अशा-या महात्म्याला एका तरुणाने ३० जानेवारी १९४८ रोजीं सायंप्रार्थथेला जातेवेळी छातीवर गोळ्या घालून संपविले. जातेवेळी शांतपणे महात्म्याच्या तोंडून शब्द उमटले, हे राम! .

धन्यवाद!

तुम्हाला महात्मा गांधी मराठी भाषण (mahatma gandhi marathi bhashan) कस वाटलं हे कंमेंट करा. आणि आपल्या मित्रां सोबत share करा.

लोकमान्य टिळक मराठी भाषण

सावित्रीबाई फुले मराठी भाषण

१५ ऑगस्ट मराठी भाषण

बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण

You might like

Post a comment, contact form.

3+ महात्मा गांधी जयंती भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi: मित्रांनी मी आपल्याकरिता Mahatma Gandhi Jayanti Bhashan in marathi भाषण मराठी मध्ये लिहलेले आहे. जर तुह्मी एक पेक्षा जास्त भाषण शोधात आहेत तर तुमचा शोध येथे संपणार आहे. तुम्हाला भाषण कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. आणि बरीचशी माहिती मराठी ब्लॉग वर उपलबध आहे ते पण तुह्मी वाचू शकता ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद

अनुक्रमणिका:

  • 1 महात्मा गांधी जयंती भाषण मराठी मध्ये Mahatma Gandhi Speech in Marathi
  • 2 महात्मा गांधी भाषण Mahatma Gandhi Jayanti speech Marathi
  • 3 महात्मा गांधी जयंती भाषण Mahatma Gandhi Speech Marathi
  • 4 महात्मा गांधी जयंती भाषण मराठी Mahatma Gandhi Jayanti Bhashan Marathi
  • 5 राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती भाषण मराठी
  • 6 महात्मा गांधींबद्दल 10 ओळी Mahatma Gandhi Speech in Marathi 10 lines
  • 7 FAQ: महात्मा गांधींबद्दल प्रश्न आणि उत्तर

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी मध्ये Mahatma Gandhi Speech in Marathi

महात्मा गांधी जयंती भाषण क्र. १ Mahatma Gandhi Speech in Marathi ( gandhi jayanti speech in marathi)

उपस्थित असलेले सदस्य , आणि मित्रानो (Mahatma Gandhi Speech in Marathi)

अहिंसा आणि सामाजिक परिवर्तनासाठी आपल्या अतुलनीय समर्पणाने इतिहासाची वाटचाल बदलून टाकणाऱ्या माणसाच्या अतुलनीय जीवनाचे स्मरण करण्यासाठी आम्ही आज येथे जमलो आहोत. भारतीय राष्ट्रपिता महात्मा गांधी हे केवळ एक नेते नव्हते; ते सत्य, करुणा आणि लवचिकतेचे प्रतीक होते.

गांधींची अहिंसक विचारधारा, किंवा सत्याग्रह ही एक जबरदस्त शक्ती होती ज्याने वसाहती सरकारला हादरा दिला आणि जगभरातील स्वातंत्र्य आणि न्यायासाठी असंख्य मोहिमांना प्रेरणा दिली. हिंसाचाराचा अवलंब न करता अन्याय आणि अत्याचारावर मात केली जाऊ शकते असे त्याला वाटले, परंतु शांत प्रतिकार आणि सविनय कायदेभंगाद्वारे. त्यांच्या अढळ श्रद्धेमुळेच ते भारताला ब्रिटीशांच्या वर्चस्वातून स्वातंत्र्य मिळवून देऊ शकले.

भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या पलीकडेही गांधींची मूल्ये आपल्या काळातील समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. कलह आणि वैमनस्य असलेल्या समाजात त्यांचा अहिंसेचा संदेश नेहमीप्रमाणेच समयोचित आहे. हे आपल्याला समस्यांवर शांततापूर्ण उपाय शोधण्यासाठी, अत्याचारितांबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी आणि सर्व लोकांशी सन्मानाने आणि आदराने वागण्याचा सल्ला देते.

आज आपण महात्मा गांधींचा सन्मान करत असताना, आपण त्यांच्या स्मृतीला केवळ श्रद्धांजलीच वाहणार नाही तर त्यांचा वारसा पुढे चालवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे नूतनीकरण करूया. त्याने कल्पिलेल्या जगाला न्याय, समता आणि शांतता प्रदान करण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करूया. त्यांच्या विचारांना पुढे नेऊया आणि सत्य आणि शांततेच्या मार्गावर चालत राहू या, त्यांचा वारसा भावी पिढ्यांसाठी चालू राहील.

खूप खूप धन्यवाद. गांधी जयंती भाषण मराठी

हे सुद्धा वाचा :

  • 200+ नवरीचे नवीन मजेदार उखाणे
  • डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन चरित्र, माहिती
  • दिवाळी निबंध मराठी

महात्मा गांधी भाषण Mahatma Gandhi Jayanti speech Marathi

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi

महात्मा गांधी जयंती भाषण क्र. २ Mahatma Gandhi bhashan in Marathi

प्रिय मित्र आणि सदस्यगण, (mahatma gandhi bhashan marathi)

महात्मा गांधी नम्र सुरुवातीपासून इतिहासातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक बनले. परंतु आत्म-साक्षात्कार आणि साधेपणावरची त्यांची अविचल भक्ती होती जी त्यांना शक्ती किंवा ऐहिक समृद्धीच्या शोधात नव्हे तर प्रेरित करते.

गांधींचा आंतरिक परिवर्तनाच्या परिवर्तनवादी शक्तीवर विश्वास होता. खऱ्या परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. स्वत:च्या कमतरतांवर मात करून स्वत:ची शिस्त आणि आत्म-जागरूकता याद्वारे एक चांगली व्यक्ती बनण्याची त्यांची इच्छा होती. त्याने प्रसिद्धपणे म्हटल्याप्रमाणे, “तुम्ही जगात पाहू इच्छित बदल व्हा.”

गांधींच्या जीवनाचा आणखी एक सिद्धांत म्हणजे साधेपणा. त्यांनी उपदेश केल्याप्रमाणे तपस्या आणि नम्रतेचे जीवन जगले. त्याची मूलभूत जीवनशैली आणि पोशाख निवड केवळ प्रतीकात्मक नव्हती; सांसारिक वस्तू सुखाचा आणि पूर्ततेचा मार्ग नसल्याचा त्यांचा मनापासून असलेला विश्वास ते प्रतिबिंबित करतात. वास्तविक समाधानाचा मार्ग आणि साधे जीवन जगून भौतिक लालसेपासून विभक्त होऊन मिळणारे स्वातंत्र्य त्यांनी दाखवून दिले.

आज, भौतिकवादाचे वर्चस्व असलेल्या आणि बाह्य सिद्धींच्या मागे लागलेल्या समाजात, गांधींचा आत्म-साक्षात्कार आणि साधेपणाचा संदेश एक उपयुक्त आठवण आहे. हे आपल्याला विराम देण्यास, चिंतन करण्यास आणि आपल्या जीवनात स्पष्ट पलीकडे उद्देश शोधण्यास प्रोत्साहित करते. हे आपल्याला आपल्या आसक्ती सोडून इतरांसाठी अर्थपूर्ण आणि सेवेचे जीवन जगण्यास प्रेरित करते.

आज आपण महात्मा गांधींचे स्मरण करत असताना त्यांचे धडे आत्मसात करूया आणि सराव करूया. चला आत्म-सुधारणा आणि अधिक न्याय्य आणि काळजी घेणार्‍या जगासाठी प्रयत्न करूया. आपण साधेपणाचा आनंद पुन्हा शोधू या आणि ज्या गोष्टी खरोखरच महत्त्वाच्या आहेत – प्रेम, करुणा आणि आपल्या सहमानवांचे कल्याण अशा गोष्टींमध्ये पूर्णता मिळवू या.

खूप खूप धन्यवाद. (Mahatma Gandhi Bhashan in Marathi)

  • संत ज्ञानेश्वर महाराज माहिती मराठी
  • संत एकनाथ महाराज माहिती मराठी
  • संत तुकाराम महाराज माहिती मराठी

महात्मा गांधी जयंती भाषण Mahatma Gandhi Jayanti bhashan in Marathi

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi

महात्मा गांधी जयंती भाषण Mahatma Gandhi Speech Marathi

महात्मा गांधी जयंती भाषण क्र. ३ Mahatma Gandhi Jayanti bhashan in Marathi

आदरणीय महोदय आणि उपस्थित असलेले नागरिक, (mahatma gandhi bhashan marathi)

द्रष्टे नेते महात्मा गांधी यांनी केवळ भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या लढ्याद्वारेच नव्हे तर त्यांच्या एकता आणि समावेशाच्या दृष्टीकोनातून इतिहासावर कायमस्वरूपी प्रभाव पाडला.

जात, पंथ, धर्म आणि राष्ट्रीयता यांच्या पलीकडे जाऊन खरा विकास साधला तरच खरा विकास होऊ शकतो यावर गांधींचा ठाम विश्वास होता. भारतातील विविध संस्कृतींमध्ये एकतेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. हिंदू आणि मुस्लिमांमधील फूट भरून काढण्याचे त्यांचे प्रयत्न, तसेच दलितांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या लढ्याने अखंड भारतासाठी त्यांचे अतुलनीय समर्पण दाखवून दिले.

गांधीजींची दृष्टी आपल्या देशाच्या सीमेपलीकडे पसरलेली होती. त्यांनी जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा पुरस्कार केला. त्यांनी वांशिक भेदभावाविरुद्ध आणि जगभरातील अत्याचारित लोकसंख्येच्या हक्कांसाठी लढा दिला, विशेषत: दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकन-अमेरिकन आणि भारतातील स्थानिक भारतीय.

गांधींचा एकता आणि समावेशाचा संदेश आजच्या जोडलेल्या समाजात अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण अनेक जागतिक समस्यांना तोंड देत असताना, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपली शक्ती एकत्र येण्याच्या आणि एक होऊन कार्य करण्याच्या आपल्या क्षमतेमध्ये असते. आपण विविधतेचा स्वीकार केला पाहिजे आणि परस्पर समंजसपणा वाढवला पाहिजे, हे मान्य करून की प्रत्येक व्यक्ती, पार्श्वभूमीची पर्वा न करता, आपल्या सामूहिक प्रवासात सुधारणा करू शकेल अशा अद्वितीय दृश्यांचे योगदान देते.

जसे आपण महात्मा गांधींचे स्मरण करतो, तेव्हा आपण त्यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन अधिक सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी कार्य करूया. आपण फूट पाडणाऱ्या समजुती नाकारू या आणि अशा समाजासाठी प्रयत्न करूया ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला सन्मान आणि आदराने वागवले जाईल. मानवजातीच्या सर्वोच्च तत्त्वांसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या माणसाचा वारसा आपण पुढे चालू ठेवू.

  • लोकमान्य टिळकांचे ५ भाषण
  • लोकमान्य टिळक यांची माहिती, जीवन चरित्र
  • गुरु पौर्णिमा भाषण

महात्मा गांधी जयंती भाषण | Mahatma Gandhi Jayanti bhashan in Marathi

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी Mahatma Gandhi Jayanti Bhashan Marathi

महात्मा गांधी जयंती भाषण क्र. ४ mahatma gandhi jayanti bhashan marathi

प्रिय सहकाऱ्यांनो, ( Mahatma Gandhi Bhashan in Marathi )

आज, जसे आपण महात्मा गांधींचे स्मरण करण्यासाठी एकत्र येत आहोत, तेव्हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा एक कमी-जाणलेला भाग विचारात घ्या: पर्यावरणाबद्दल त्यांची सखोल चिंता आणि शाश्वत जीवनावर भर.

गांधींनी मानव आणि निसर्ग यांच्यातील अंतर्निहित दुवा ओळखला. आपण पर्यावरणापासून स्वतंत्र नसून त्याचाच एक भाग आहोत याची जाणीव त्याला झाली. त्यांनी पर्यावरणाची काळजी घेतली आणि “साधी राहणी, उच्च विचारसरणी” या संकल्पनेवर विश्वास ठेवला. गांधींनी किमान जीवनशैलीचे नेतृत्व केले आणि इतरांनाही असे करण्यास उद्युक्त केले, असा विश्वास होता की अति सेवनाने केवळ पर्यावरणालाच हानी पोहोचत नाही तर असमानता आणि सामाजिक अन्याय देखील निर्माण होतो.

“स्वदेशी” (स्वयंपूर्णता) या त्यांच्या संकल्पनेचा उद्देश स्थानिक उत्पादन आणि वापराला चालना देणे, कार्बनचे ठसे कमी करणे आणि ग्रामीण लोकांचे जीवनमान सुधारणे हे आहे. शाश्वत भविष्याच्या गांधींच्या दृष्टीमध्ये अक्षय ऊर्जा, कचरा कमी करणे आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण समाविष्ट आहे.

हवामान बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास या गंभीर समस्यांशी आपण झगडत असताना गांधींचा संदेश अधिक समर्पक बनतो. त्याच्या शिकवणी आपल्याला अधिक जागरूक आणि पर्यावरणाविषयी जागरूक जीवनशैली जगण्यास प्रोत्साहित करतात. हे आपल्याला आठवण करून देते की आपल्यापैकी प्रत्येकामध्ये आपल्या जगाच्या संरक्षणासाठी योगदान देण्याची क्षमता आहे.

आपण महात्मा गांधींच्या उदाहरणाचे अनुकरण करू आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आक्रमक प्रयत्न करूया. आपल्या दैनंदिन जीवनात शाश्वत पद्धतींचा समावेश करून आणि जबाबदार कायद्यासाठी मोहीम राबवून आपण भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवा आणि निरोगी ग्रह सुरक्षित करू शकतो. एकत्रितपणे, आपण गांधींचा वारसा पुढे चालू ठेवू शकतो आणि आपल्या मुलांसाठी सोडण्यात आपल्याला अभिमान वाटेल अशा जगाचे कारभारी होऊ शकतो.

खूप खूप धन्यवाद. (Mahatma Gandhi Speech in Marathi)

  • छत्रपती शिवाजी महाराज वर ५ छान भाषण
  • सावित्रीबाई फुले यांची ५ भाषणे
  • माझी आई निबंध

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती भाषण मराठी

महात्मा गांधी जयंती भाषण क्र. ५ Mahatma Gandhi Speech in Marathi

उपस्थित असलेले आदरणीय सदस्य आणि मित्रानो, (mahatma gandhi jayanti bhashan marathi)

आज आपण महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी भेटतो, जो सामाजिक अन्याय आणि विषमतेच्या विरोधात जबरदस्त शक्ती होता.

विविध प्रकारच्या जुलूमशाहीविरुद्ध गांधींनी अथक लढा दिला. त्यांनी वसाहतवादी सत्तेपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचे नेतृत्व केले नाही तर देशातील खोलवर बसलेल्या सामाजिक अन्यायांनाही त्यांनी आव्हान दिले. समाजातील उपेक्षित गट, विशेषत: दलित आणि स्त्रिया सुधारण्यासाठी त्यांच्या सततच्या प्रयत्नांनी समता आणि न्यायासाठी त्यांचे समर्पण दिसून आले.

कोणत्याही समाजाने आपल्या अतिसंवेदनशील सदस्यांचे हक्क आणि सन्मान नाकारल्यास त्याची भरभराट होऊ शकत नाही यावर त्यांचा ठाम विश्वास होता. गांधींनी भारताच्या कठोर जातिव्यवस्थेला विरोध केला, ज्याने पिढ्यानपिढ्या देशाला त्रास दिला. ते अत्याचारितांच्या समावेशासाठी आणि सक्षमीकरणाचे एक स्पष्ट वकिल होते, अस्पृश्यता आणि पूर्वग्रह दूर करण्यासाठी अथक प्रयत्न करत होते.

संकटांना तोंड देत, अहिंसेसाठीच्या त्यांच्या अतुलनीय समर्पणाने लाखो लोकांना प्रेरणा दिली आणि हे सिद्ध केले की हिंसाचाराचा अवलंब न करताही बदल साध्य केला जाऊ शकतो. गांधींचा सामाजिक परिवर्तनाचा दृष्टिकोन करुणा, समजूतदारपणा आणि सहानुभूतीवर आधारित होता.

आज आपण महात्मा गांधी आणि त्यापुढील अपूर्ण व्यवसायाचे स्मरण करूया. जगातील अनेक प्रदेशांमध्ये सामाजिक असमानता कायम आहे आणि भेदभाव अजूनही अनेक लोकांसाठी एक वास्तविकता आहे. आपल्यात फूट पाडणारे अडथळे दूर करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करून आपण गांधींचा वारसा पुढे चालू ठेवला पाहिजे.

अशा समाजाची निर्मिती करण्यासाठी आपण एकत्र काम करूया ज्यामध्ये प्रत्येकाला, पार्श्वभूमीची पर्वा न करता, सन्मानाची वागणूक दिली जाईल आणि समान संधी दिली जाईल. आपण दमनकारी संरचनांशी लढूया आणि समावेशक आणि सामाजिक शांततेला प्रोत्साहन देणाऱ्या उपायांसाठी मोहीम राबवूया.

महात्मा गांधींचा सामाजिक अन्यायाविरुद्धचा लढा हा आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आणि कृती करण्याचे आवाहन आहे. प्रत्येक माणूस सन्मानाने आणि स्वातंत्र्याने जगू शकेल अशा समाजाचा आदर्श समजून जगाला अधिक न्याय्य आणि न्याय्य स्थान बनवण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करूया.

खूप खूप धन्यवाद. Mahatma Gandhi Speech in Marathi

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची माहिती 
  • डॉ. एपीजे अब्दुल कलाम महिती चरित्र
  • लाल बहादूर शास्त्री जीवन चरित्र व माहिती

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi

महात्मा गांधींबद्दल 10 ओळी Mahatma Gandhi Speech in Marathi 10 lines

  • 2 ऑक्टोबर 1869 रोजी जन्मलेल्या महात्मा गांधी हे ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख नेते होते.
  • अहिंसक मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी त्यांना “राष्ट्रपिता” म्हणून संबोधले जाते.
  • सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणार्‍या गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने दडपशाहीवर मात करण्यासाठी सत्य आणि प्रेमाच्या सामर्थ्यावर जोर दिला.
  • अन्यायकारक ब्रिटिश कायदे आणि करांचा निषेध करण्यासाठी त्यांनी सॉल्ट मार्चसारख्या अनेक सविनय कायदेभंग मोहिमांचे नेतृत्व केले.
  • गांधी आत्मनिर्भरतेवर दृढ विश्वास ठेवणारे होते आणि त्यांनी “स्वदेशी” या संकल्पनेद्वारे स्वदेशी वस्तू आणि हस्तकलेच्या वापरास प्रोत्साहन दिले.
  • ते सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते आणि त्यांनी भारतीय समाजातील जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला.
  • आयुष्यभर, गांधींनी एक साधी आणि काटकसरी जीवनशैली जगली, त्यांच्या तत्त्वांप्रती नम्रता आणि समर्पणाचे उदाहरण मांडले.
  • त्यांनी जातीय सलोखा आणि धार्मिक सहिष्णुतेसाठी अथक परिश्रम घेतले आणि सर्व धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.
  • गांधींच्या शिकवणी आणि शांततापूर्ण प्रतिकाराच्या पद्धतींनी मार्टिन ल्यूथर किंग जूनियर आणि नेल्सन मंडेला यांच्यासह जगभरातील नागरी हक्क चळवळी आणि नेत्यांना प्रेरणा दिली.
  • त्यांचा वारसा जागतिक स्तरावर साजरा केला जात आहे आणि न्याय्य आणि सर्वसमावेशक समाजाची त्यांची दृष्टी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
  • क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ?
  • जागतिक महिला दिन भाषण मराठी
  • महात्मा गांधी संपूर्ण माहिती

FAQ: महात्मा गांधींबद्दल प्रश्न आणि उत्तर

प्रश्न: महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय आहे? उत्तर: मोहनदास करमचंद गांधी.

प्रश्न: गांधींचा जन्म कधी झाला? उत्तर: २ ऑक्टोबर १८६९.

प्रश्न: गांधींचे टोपणनाव काय आहे? उत्तर: महात्मा (“महान आत्मा”).

प्रश्न: गांधींचा जन्म कुठे झाला? उत्तर: पोरबंदर, भारत.

प्रश्न: गांधीजींचे मुख्य तत्व काय होते? उत्तर: अहिंसा (सत्याग्रह).

प्रश्न: गांधीजींनी कोणत्या देशात प्रथम मोठ्या आंदोलनाचे नेतृत्व केले? उत्तर: दक्षिण आफ्रिका.

प्रश्न: मीठ मार्च काय होता? उत्तर: ब्रिटीश मीठ करांच्या विरोधात 240 मैलांचा निषेध.

प्रश्न: गांधींनी ब्रिटिश कापडाचा विरोध कसा केला? उत्तर: त्यांनी स्वतःचे कापड (खादी) कातण्याचा प्रचार केला.

प्रश्न: गांधींनी भारतात कशासाठी लढा दिला? उत्तर: ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य.

प्रश्न: गांधींनी भारतीय स्वातंत्र्यासाठी कोणत्या चळवळीचे नेतृत्व केले? उत्तर: भारत छोडो आंदोलन.

प्रश्न: गांधींनी दलितांचे वर्णन कसे केले? उत्तर: हरिजन (“देवाची मुले”).

प्रश्न: गांधींचा मृत्यू कधी झाला? उत्तर: ३० जानेवारी १९४८.

प्रश्न: महात्मा गांधींची हत्या कोणी केली? उत्तर: नथुराम गोडसे, हिंदू राष्ट्रवादी.

प्रश्न: राजकीय नेता होण्यापूर्वी गांधींचा व्यवसाय काय होता? उत्तर: वकील.

प्रश्न: गांधीजींच्या हयातीत किती वेळा तुरुंगात गेले? उत्तर: 7 वेळा.

प्रश्न: गांधीजींनी उपवास आणि प्रार्थनेचा दिवस म्हणून कोणता भारतीय सण पाळला? उत्तर: दिवाळी.

प्रश्न: गांधी त्यांच्या शोबद्दल प्रसिद्धपणे काय म्हणाले? उत्तर: “माझे जीवन हाच माझा संदेश आहे.”

प्रश्न: डँडी मार्च काय होता? उत्तर: द सॉल्ट मार्च किंवा दांडी सत्याग्रह, सविनय कायदेभंग चळवळीचा भाग.

प्रश्न: 1930 मध्ये टाइम मासिकाने गांधींना कोणते शीर्षक दिले? उत्तर: “मॅन ऑफ द इयर.”

प्रश्न: महात्मा गांधींनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? उत्तर: “सत्यासह माझ्या प्रयोगांची कथा.”

प्रश्न: गांधींनी त्यांची शेवटची सार्वजनिक प्रार्थना सभा कोणत्या शहरात घेतली होती? उत्तर: नवी दिल्ली

प्रश्न: गांधीजींच्या जयंतीनिमित्त कोणता दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून पाळला जातो? उत्तर: २ ऑक्टोबर.

प्रश्न: गांधीजींच्या जीवनात चरख्याचे महत्त्व काय आहे? उत्तर: हे स्वयंपूर्णता, साधेपणा आणि आर्थिक स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.

  • स्वामी विवेकानंद माहिती मराठी
  • साने गुरुजी यांची संपूर्ण माहिती मराठी
  • राष्ट्रसंत गाडगे बाबा माहिती मराठी

  • 7+ माझी शाला निबंध
  • नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती
  • नेताजी सुभाषचंद्र बोस भाषण

Related Posts

Leave a comment cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Recent Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना Majhi Ladki Bahin Yojana 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना माहिती Majhi Ladki Bahin Yojana 2024

weight loss

वजन कमी करण्यासाठी आहारात पोळी आणि भाताचा समावेश करू शकता का?

Latest जीबी व्हाट्सएप डाउनलोड करें

Latest जीबी व्हाट्सएप डाउनलोड करें

पेट में गैस हो तो क्या खाना चाहिए और क्या नहीं

पेट में गैस हो तो क्या खाना चाहिए और क्या नहीं

हाई ब्लड प्रेशर को तुरंत कंट्रोल कैसे करे

हाई ब्लड प्रेशर को तुरंत कंट्रोल कैसे करे ।जानिए

mahatma gandhi best speech in marathi

थायराइड का रामबाण इलाज, लक्षण और उपाय

Health: शुगर को जड़ से खत्म करने के लिए क्या खाना चाहिए?: (What should be eaten to eliminate sugar completely

शुगर को जड़ से खत्म करने के लिए क्या खाना चाहिए

मुद्रा लोन ऑनलाइन अप्लाई कैसे करे ! Mudra Loan Online Apply

मुद्रा लोन ऑनलाइन अप्लाई कैसे करे ! जानिए

© 2023 englishmarathi.in | All rights reserved

Privacy Policy | Disclaimer | About Us | Contact Us

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

(2024) महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi

महात्मा गांधी भाषण मराठी  व Mahatma Gandhi Jayanti bhashan Marathi

महात्मा गांधी भाषण मराठी - Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi : मित्रांनो भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी देशाच्या स्वतंत्र लढ्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. गांधीजींनी देशाला अहिंसेच्या मार्गाने स्वतंत्र मिळवून देण्यासाठी कार्य केले. आज भारतच नव्हे तर जगभरात गांधीजींचे अहिंसावादी विचार प्रसिद्ध आहेत. 

या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती भाषण मराठी शेअर करीत आहोत. Mahatma Gandhi Speech in Marathi शाळा कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसाठी फार उपयोगाचे आहे. तर चला महात्मा गांधी जयंतीच्या भाषणाला सुरूवात करूया...

mahatma gandhi speech in marathi

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी - Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi

भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांच्या जन्म 2 ऑक्टोंबर 1869 साली गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला. 2 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून सुद्धा पाळला जातो. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई असे होते. पुतळाबाई या करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी होत्या आणि महात्मा गांधी हे त्यांचे शेवटचे अपत्य होते. महात्मा गांधींना ब्रिटिश शासनाविरुद्ध भारतीय राष्ट्रीय आंदोलनाचे नेता व भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते.

महात्मा गांधीजींची आई पुतळाबाई अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्री होत्या. त्यांच्या या स्वभावाचा परिणाम लहान मोहनदास यांच्यावर झाला आणि याच मूल्यांनी पुढे जाऊन त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मोहनदास स्वभावाने अहिंसा, शाकाहार आणि विविध धर्मातील मूल्यांना मानणारे होते.  

सन 1883 मध्ये साडे तेरा वर्षाच्या वयात त्यांचे लग्न 14 वर्षाच्या कस्तुरबा यांच्याशी करण्यात आले. ज्यावेळी मोहनदास पंधरा वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या प्रथम मूल ने जन्म घेतला. परंतु काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. मोहनदास यांचे वडील करमचंद गांधी चे सुद्धा त्याच वर्षी 1885 मध्ये निधन झाले. यानंतर मोहनदास आणि कस्तुरबा यांना चार अपत्य झालीत.

मोहनदास यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर मध्ये तर हायस्कूल चे शिक्षण राजकोट मध्ये पूर्ण झाले. शैक्षणिक स्तरावर मोहनदास एक सामान्य विद्यार्थी होते. सन 1887 मध्ये त्यांनी मॅट्रिक ची परीक्षा अहमदाबाद हून उत्तीर्ण केली. या नंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याना लंडन जाऊन बॅरिस्टर होण्याचा सल्ला दिला. वर्ष 1888 मध्ये मोहनदास युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी व बॅरिस्टर बनण्यासाठी इंग्लंडला गेले. जून 1891 मध्ये तीन वर्षांनी गांधीजी भारतात परत आले. भारतात आल्यावर त्यांना आपल्या आईच्या मृत्यूची सूचना मिळाली. यानंतर त्यांनी बॉम्बे येथे वकिली करणे सुरू केले. सन 1893 साली दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय केस ची वकिली करण्याच्या करार त्यांनी स्वीकारला. 24 वर्षाचे असताना गांधीजी दक्षिण आफ्रिकेत पोहोचले. दक्षिण आफ्रिकेत त्यांना गंभीर वंशवाद आणि नस्ल भेदाचा सामना करावा लागला. या सर्व घटना त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण वळण बनल्या, दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होत असलेल्या अन्यायाला पाहून त्यांच्या मनात इंग्रजीशासना अंतर्गत असलेल्या भारतीयांच्या सन्मान आणि आपली स्वतःची ओळख यासंबंधित प्रश्न उठायला लागले. यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना राजनेतिक आणि सामाजिक अधिकार प्राप्त करणे आणि त्यासाठी संघर्ष करण्यासाठी प्रेरित केले.

वर्ष 1914 मध्ये गांधीजी भारतात परत आले. या काळात ते एक राष्ट्रवादी नेता म्हणून प्रसिद्ध होऊन गेले होते. भारतात आल्यावर त्यांनी चंपारण व खेडा सत्याग्रह, खिलाफत आंदोलन, असहयोग आंदोलन, स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह, हरिजन आंदोलन, भारत छोडो आंदोलन असे एक न अनेक आंदोलने करून लोकांना इंग्रज शासनाविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने एकत्रित केले. 9 ऑगस्ट 1942 ला गांधीजींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले. भारत छोडो स्वतंत्रता आंदोलन त्या काळातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली आंदोलन बनून गेले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने स्वातंत्र्यसेनानी मारले गेले. यानंतर ब्रिटीश सरकारने महात्मा गांधी समेत अनेक मोठमोठ्या काँग्रेसच्या नेतांना तुरुंगात टाकून दिले. भारत छोडो आंदोलनाचा भारतीय जनतेवर खूप मोठा परिणाम झाला. लोक संघटित होऊन गेले. यानंतर दुसरे विश्व युद्धाच्या समाप्तीपर्यंत ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य करण्याचे संकेत देऊन दिले आणि अशा पद्धतीने सर्व नेत्यांना मुक्त करत भारताला स्वातंत्र्य मिळाले.

30 जानेवारी 1948 महात्मा गांधी दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये एका प्रार्थनेला संबोधित करायला जात होते. संध्याकाळी 05:17 ला नाथूराम गोडसे नावाच्या एका कट्टरपंथी व्यक्तीने त्यांच्या छातीत तीन गोळ्या मारून त्यांची हत्या केली. असे मानले जाते की महात्मा गांधी यांचे शेवटचे शब्द 'हे राम' असे होते. यानंतर नाथूराम गोडसे व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला व 1949 मध्ये त्या सर्वांना मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली.

महात्मा गांधी भाषण मराठी - M ahatma Gandhi jayanti bhashan Marathi

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो. आज 2 ऑक्टोंबर म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत. आज मी तुम्हाला महात्मा गांधी बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही विनंती.

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. 

गांधीजींनी आपले सुरुवातीचे शिक्षण ब्रिटिश शासित भारतात पूर्ण केले. आणि नंतर उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. शिक्षण झाल्यानंतर ते आपल्या पत्नी कस्तुरबांसोबत दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तेथे अनेक वर्षे वास्तव्य केले. त्यांनी तेथे साधे जीवन व्यतीत केले पण दक्षिण आफ्रिकेत राहणा-या भारतीयांविरुद्धच्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याच्या चळवळींमध्ये ते सक्रिय राहिले.

अन्याय आणि बेकायदेशीर गोष्टींविरुद्धचा त्यांचा संघर्ष आफ्रिकेतील सविनय कायदेभंग चळवळीपासून सुरू झाला, ज्याची सुरुवात १९०६ साली झाली. तेथे भारतीयांना बेकायदेशीर कर भरण्यास भाग पाडले जात होते. चळवळीदरम्यान, दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या अनेक भारतीयांना गोळ्या घालून ठार करण्यात आले आणि अनेकांवर गंभीर अत्याचार करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आठ वर्षे लढा दिला. 

दक्षिण आफ्रिकेत एकदा रेल्वेने प्रवास करत असताना एका युरोपियन प्रवाशाला त्यांची जागा न दिल्यामुळे गांधीजींना फर्स्ट क्लासच्या डब्यातून बाहेर हकलण्यात आले. येथूनच त्यांच्या मनामधील स्वातंत्र्याची मशाल पेटली आणि भारताला मुक्त करण्यासाठी ते कायमचे भारतात परतले.

मायदेशी परतल्यावर त्यांनी १९१७ मध्ये चंपारण सत्याग्रहाद्वारे स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली. त्यानंतर ते १९२० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. महात्मा गांधींचा लढा सत्याग्रह, अहिंसक चळवळ, सत्य आणि कायदेशीर लढाईने सुरू झाला.

यानंतर त्यांनी काही प्रमुख लोकांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ, भारत छोडो आंदोलन, असहकार चळवळ अशा अनेक चळवळी सुरू केल्या. १९३० मध्ये त्यांनी दांडी यात्रा काढली, हजारो भारतीयांनी या मोहिमेत सामील होऊन सुमारे ३८५ किमी पायी प्रवास केला आणि मिठाचा सत्याग्रह केला. भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या चळवळीने लोकांना एकत्र आणले.

गांधीजींना त्यांच्या आयुष्यातील अनेक टप्प्यांवर ब्रिटिश सरकारने तुरुंगात टाकले, परंतु त्यांनी कधीही हिंसेचा मार्ग निवडला नाही, उलट दिवसभर संप आणि आमरण उपोषण करून त्यांनी त्यांचा लढा सुरू ठेवला. 

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आणि भारतीय लोकांच्या जीवनातील गांधीजींचे योगदान निर्विवाद आहे. आपल्याला एक स्वतंत्र देश मिळवून देण्यासाठी त्यांच्या पूर्ण समर्पणाचे आपण भारतीय खरोखरच ऋणी आहोत. ब्रिटिश राजवटीच्या तावडीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला. त्यांच्या संघर्षाचे फळ म्हणून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यांनी हे स्वातंत्र्य हिंसाचाराने नव्हे तर अहिंसेने व शांततेच्या मार्गाने मिळवून दिले. 

२०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीत, अनेक भारतीयांनी ब्रिटीश राजवट आपले भाग्य म्हणून स्वीकारली होती आणि सर्व अयशस्वी प्रयत्नांसह स्वातंत्र्य मिळविण्याचा विचार सोडला होता. मात्र महात्मा गांधींनी भारतीय लोकांच्या हृदयात पुन्हा स्वातंत्र्याची आग पेटवली आणि भारतमातेसाठी लढण्यास प्रेरणा दिली. 

भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या निखळ समर्पणाच्या पलीकडे ते उच्च मूल्यांचे व्यक्तिमत्त्वही होते. त्यांच्या जीवनातून खूप काही शिकण्यासारखे आहे. महात्मा गांधींनी खादीच्या पोशाखात आयुष्य जगत स्वतःचे कपडे कातले आणि कधीही अन्न वाया घालवले नाही. त्यांनी केवळ आपल्या जीवनातच स्वदेशी गोष्टी वापरल्या नाहीत तर भारतीयांना परदेशी कापड न वापरता स्वदेशी कापड व इतर गोष्टी वापरण्याचे आवाहन केले. खादी स्वीकारण्याच्या त्यांच्या चळवळीमुळे लोकांनी खादी वापरण्याची सुरुवात केली आणि विदेशी वस्तूंचा बहिष्कार केला. 

या व्यतिरिक्त, महात्मा गांधींनी स्वच्छतेच्या मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित केले. आज आपल्या भारताच्या पंतप्रधानांनीसुद्धा बापूंची शिकवण पुढे नेण्यासाठी आणि भारतातील लोकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे.

आणखी एक गोष्ट ज्याबद्दल गांधीजीनी अगदी विलक्षण काम केले ते म्हणजे त्या काळातील अस्पृश्यांसोबत होणारी वागणूक. तथाकथित अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते कठोर होते. त्यांनीच अशा लोकांना ‘हरिजन’ म्हणून संबोधित केले आणि त्यांना देवाची मुले ही पदवी दिली. लोकांनी त्यांच्यासाठी इतर अपमानास्पद शब्द वापरू नयेत आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी १९३३ मध्ये हरिजन, हरिजन सेवक आणि हरिजन बंधू नावाची नियतकालिके गुजराती, हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित केली.

स्वातंत्र्यानंतर, त्यांनी हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्यासाठी काम केले. १५ जून २००७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने गांधी जयंती हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून घोषित केला. दरवर्षी, भारताचे पंतप्रधान प्रत्येक भारतीयात जिवंत असलेल्या त्यांच्या आत्म्याला पुष्प अर्पण करून आणि प्रार्थना करून राज घाटावर श्रद्धांजली अर्पण करतात. 

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अहिंसेचे आणि शांततेच्या मार्गाचे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात खूप मोठे योगदान असले तरी इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची उपेक्षा करता येणार नाही. अशा महान स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे आपण ऋणी आहोत. गांधी जयंती हा भारतातील लोकांना प्रेरणा देणारा आणि कोणाविरुद्धही  हिंसा न करता आपली मूल्ये जपत अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा संदेश देणारा दिवस आहे. महात्मा गांधींचे जीवन आपल्यासाठी एक धडा आहे. त्यांच्या आयुष्यातून शिकणे आणि त्यांनी सांगितलेल्या मूल्यांचा आपल्या आयुष्यात समावेश करणे व दररोज त्याचा सराव करणे महत्वाचे आहे. त्यांच्या शिकवणीने मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर सारख्या अनेक महान व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव टाकला आहे. मला विश्वास आहे की, त्यांच्या जीवनातून आपणसुद्धा बऱ्याच गोष्टी शिकू आणि त्यांची शिकवण पुढे घेऊन जाऊ.

महात्मा गांधी भाषण मराठी  Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi : तर मंडळी वरील लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 2 महात्मा गांधी जयंती भाषण शेअर केलेत. आशा आहे आपणास ही भाषणे उपयोगी ठरली असतील. Mahatma Gandhi Bhashan Marathi हे शाळा कॉलेज मध्ये होणाऱ्या भाषण स्पर्धेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. आपण या भाषणाला आपल्या पद्धतीने एडिट करून भाषणसाठी वापरू शकतात. धन्यवाद..

1 टिप्पण्या

Thank you so much it,s very much important .. and very useful speech 👌👍👍.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

mahatma gandhi best speech in marathi

infinitymarathi

  • मराठी निबंध
  • उपयोजित लेखन
  • पक्षांची माहिती
  • महत्वाची माहिती
  • भाषणे
  • कोर्स माहिती

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 2024 | mahatma gandhi speech in marathi

 महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 2024 | महात्मा गांधी जयंती भाषण निबंध| mahatma gandhi jayanti bhashan marathi | mahatma gandhi speech marathi pdf.

mahatma gandhi speech in marathi:नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आज आपण महात्मा गांधीजी यांच्या विषयी मराठी भाषण बघणार आहोत हे  गांधीजींच्या जयंती मराठी भाषण वर्ग ५ ते 10 चे विद्यार्थी आपल्या भाषणाची तयारी साठी वापरू शकता.हे mahatma gandhi jayanti bhashan marathi भाषण तुम्ही गांधी जयंती तसेच पुण्यतिथी या दिवशी तुम्ही आपल्या शाळेमध्ये सादर करू शकतात चला तर मग सुरू करूयात mahatma gandhi speech in marathi भाषणाला.

महात्मा गांधी जयंती पुण्यतिथी भाषण मराठी |  mahatma gandhi bhashan marathi speech

महात्मा गांधी जयंती भाषण | mahatma gandhi bhashan marathi 2023 | Mahatma gandhi speech in marathi 

mahatma gandhi jayanti bhashan marathi:सन्माननीय व्यासपीठ,आदरणीय अध्यक्ष,महोदय उपस्थित गुरुजन वर्ग तसेच माझ्या छोट्या आणि मोठ्या बांधवांना माझा सप्रेम नमस्कार, मी आजच्या दिवशी मी तुम्हाला सर्वांचे लाडके असे ज्यांना आपण बापू म्हणून ओळखतो यांच्या विषयी दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तरी ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी मी अपेक्षा करतो

खादी मेरी शान आहे करम मेरी पूजा है सच्चा मेरा करम और हिंदुस्तान मेरी जान है

अहिंसा आणि सत्याचा मार्ग ने बलाढ्य शत्रूला आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवणाऱ्या महात्मा गांधीजींना माझा शत शत प्रणाम

आधुनिक काळातील युगप्रवर्तक नेते म्हणून महात्मा गांधीजी यांचे नाव घेतले जाते. भारतीय जनमाणसात यांचा खूप मोठा प्रभाव होता. हे आपल्याला गांधीयुग यावरून दिसून येते.

महात्मा गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला. महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते.त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी.तरआईचे नाव पुतळीबाई असे होते.

त्यांची आई ही धार्मिक प्रवृत्तीची होती,त्यांचे बालपण हे धार्मिक वातावरणात गेले म्हणूनच गांधीजी लहानपणापासूनच धार्मिक विचाराचे होते हे आपल्याला दिसून येते. त्यांचे वडील पोरबंदर येथे दिवाण म्हणून कार्यरत होते.त्या काळात बालवयातच लग्न करण्याच्या प्रथेमुळे महात्मा गांधी यांचे लग्न वयाच्या 13 व्या वर्षी झाले. त्यांचे लग्न कस्तुरबा कपाळ या यांच्याशी बालविवाह झाला.

महात्मा गांधीजी हे लहानपणापासूनच लाजाळू स्वभावाचे  व हुशार  होते. महात्मा गांधी 1887 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. व शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी  1888 मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथे गेले तिथे त्यांनी बॅरिस्टर पदवी संपादन केली. 

उच्च शिक्षण संपादन करून 1891 मध्ये ते भारतात परतले व त्यांनी प्रथमच भारतामधील राजकोट येथे वकिली सुरू केली . व पुढे लवकरच ते एका हिंदी कंपनीचे वकील म्हणून 1893 मध्ये दक्षिण आफ्रिका येथे गेले.

व्यापार व कामधंदा निमित्त भारतीय अनेक लोक दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक झालेले होते, परंतु तेथील गोऱ्या लोकांनी भारतीय लोकांवर वर्णभेदाच्या आधारे अत्यंत अन्याय जुलूम चालवला होता. ते सर्व लोक अतिशय कठीण अवस्थेत हालाखीचे जीवन जगत होते. याच प्रकारची वर्तणूक गांधीजी यांच्यासोबत सुद्धा घडले होते. 

त्यांच्यावर होत असलेला हा अन्याय महात्मा गांधींना कळताच त्यांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले. या सरकारी अन्यायाविरुद्ध व जुलूमशाही विरुद्ध त्यांनी अहिंसक मार्गांनी लढत त्यांनी प्रथमच सत्याग्रहा चा प्रयोग करण्याचे ठरवले.

 गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनात अनेक भारतीय सहभागी झाले त्यांच्या आंदोलनामुळे दक्षिण आफ्रिकेची सरकार सुद्धा झुकली होती. भारतीयांना मानवी हक्क देण्यात आले.अशाप्रकारे महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिका मध्ये सत्याचा प्रथम प्रयोग करून अहिंसक मार्गाने अत्याचारी व जुलमी सत्तेला नमवले.

9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतील विजय संपादन करून भारतात परत ले यानंतर 1917 मध्ये त्यांनी  बिहारमधील चंपारण येथील शेतकऱ्यांना त्यांचे हक्क व जुलमी कर याच्याविरुद्ध तसेच मजुरांची होणारी पिळवणूक याच्याविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा देऊन तो जिंकला.गुजरातमधील खेडा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्येवर त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला या दोन सत्याग्रहामुळे त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली.

याप्रमाणे त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध भारत छोडो, सायमन गो बॅक, आणि असे अनेक सत्याग्रह केले. 1942 च्या चले जाव या स्वातंत्र आंदोलन चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केले होते.महात्मा गांधीजी आणि भारतातील अनेक स्वातंत्र्यसैनिक यांच्या प्रयत्नांना अनेक अखेर यश येऊन अखेर 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्य मध्ये एक गांधीजींनी योगदान दिले.

नोबल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी  गांधीजी यांना महात्मा ही उपाधी दिली तसेच सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. भारतातील जनता त्यांना प्रेमाने बापू असे म्हणत.

गांधी जी हे सत्य अहिंसेचे पुजारी होते. सत्य आज परमेश्वर परमेश्वर सत्य आहे असे त्यांचे म्हणणे होते. सत्याचा शोध घेणे म्हणजेच परमेश्वराचा शोध घेणे होय असे त्यांनी म्हटले होते.

सत्याग्रह हे गांधीजींचे शस्त्र होते.सत्याग्रही गांधीजी नि संपूर्ण जगाला दिलेली महत्त्वाची देणगी आहे.अन्याया व  शोषणाविरुद्ध केलेल्या आत्मिक शक्तीचा वापर म्हणजे सत्याग्रह होय असे त्यांनी म्हटले आहे.गांधीजी म्हणतात अहिंसेच्या मार्गाने च्या शत्रुलाही प्रेमाने जिंकता येते, अहिंसा हे अन्याय व असत्य या विरुद्ध लढण्याची सर्वात प्रभावी साधन आहे.

सर्व जगाला गांधीजींनी अहिंसेचा मार्ग दाखवला म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय 2 ऑक्टोंबर हा अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसे याच्या द्वारे करण्यात आली. 

दिल्लीतील बिर्ला भवनामध्ये गांधीजी फिरत असताना त्यांच्यावर नथुराम गोडसे यांच्या द्वारे गोळ्या चालवण्यात आल्या व यातच महात्मा गांधीजी चा मृत्यू झाला.या थोर राष्ट्रीय युगप्रवर्तक नेत्याला आदरांजली देण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो.आजच्या दिवशी गांधीजींच्या पावन प्रतिमेला व त्यांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते जय हिंद जय भारत.

  • नक्की वाचा  26 january speech marathi

Team infinitymarathi

Team infinitymarathi

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या, telegram group.

Telegram Group

  • essay in marathi
  • information in marathi
  • marathi speech
  • course information in marathi
  • advertising in Marathi

गैरवर्तनाची तक्रार करा

हा ब्लॉग शोधा.

  • जुलै 2024 2
  • जून 2024 6
  • मे 2024 1
  • एप्रिल 2024 3
  • मार्च 2024 20
  • जानेवारी 2024 2
  • डिसेंबर 2023 1
  • नोव्हेंबर 2023 4
  • ऑक्टोबर 2023 2
  • ऑगस्ट 2023 2
  • मे 2023 1
  • एप्रिल 2023 1
  • फेब्रुवारी 2023 2
  • जानेवारी 2023 2
  • ऑक्टोबर 2022 1
  • मे 2022 4
  • एप्रिल 2022 1
  • मार्च 2022 3
  • फेब्रुवारी 2022 5
  • जानेवारी 2022 1
  • डिसेंबर 2021 2
  • नोव्हेंबर 2021 2
  • ऑक्टोबर 2021 2
  • सप्टेंबर 2021 3
  • ऑगस्ट 2021 6
  • जुलै 2021 5
  • जून 2021 8
  • मे 2021 16
  • मार्च 2021 2
  • फेब्रुवारी 2021 6
  • जानेवारी 2021 1

Social Plugin

Follow us on google news.

  • https://news.google.com/publications/CAAqBwgKMMz2owswj4G8Aw?ceid=IN:en&oc=3

Featured Post

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

click here to get information

Menu Footer Widget

  • Privacy policy
  • Terms and Conditions

All In One Marathi Blog

Speech on Mahatma Gandhi Jayanti in Marathi

महात्मा गांधी जयंती निमित्त ३ उत्स्फूर्त भाषणे | Spontaneous speeches on the occasion of Mahatma Gandhi Jayanti in Marathi

Speech on Mahatma Gandhi Jayanti in Marathi – भाषण देणे ही एक कला आहे जी एखाद्या विषयावरील एखाद्या व्यक्तीच्या ज्ञानावर आणि त्याच्या भाषण शैलीवर अवलंबून असते, परंतु जेव्हा विषय महात्मा गांधी असतो, तेव्हा भाषणापूर्वी तयारी देखील आवश्यक असते. येथे आम्ही गांधी जयंती वर विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या शब्द मर्यादांसह भाषण सोप्या आणि सोप्या शब्दात देत आहोत, जे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रसंगी किंवा स्पर्धेत त्यांच्या गरजेनुसार वापरू शकतात.

चला तर सुरु करूया, महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण,

महात्मा गांधीजी वरील भाषण क्र. १- Speech on Mahatma Gandhi Jayanti in Marathi

आज गांधीजी जिवंत असते तर ते 2 ऑक्टोबर 2021 रोजी 152 वर्षांचे झाले असते, परंतु आज गांधीजी आपल्या सर्वांमध्ये जिवंत आहेत. या वर्षी 2 ऑक्टोबर 2021 रोजी महात्मा गांधींची 153 वी जयंती साजरी केली जाईल. माझ्या दृष्टीने गांधीजींचे तत्त्वज्ञान रोजच्या व्यवहारात आणणे म्हणजे खऱ्या अर्थाने गांधीवादी असणे आणि खऱ्या अर्थाने त्यांचा आदर करणे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी आपले संपूर्ण आयुष्य देशाला समर्पित केले. देशासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपिताचा दर्जा देण्यात आला आणि त्यांच्या नावावर महात्मा हा शब्द जोडण्यात आला. जयंती साजरी करणे हा फक्त पैसे देण्याचा विधी आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जयंती साजरी करत आहोत त्या जीवनाचा काही भाग किंवा प्रभाव आहे का? जर असे झाले तर आपले जीवन एका नवीन मार्गावर जाते.

एखाद्याला आदर दाखवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, म्हणून मला गांधी जयंती साजरी करण्यापेक्षा किंवा त्याच्या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापेक्षा त्यांच्या कल्पनांना जिवंत करायचे आहे. शतकानुशतके भारत ज्या प्रकारचा सुसंवाद ओळखत आहे आणि ज्या प्रकारचा भारत जग ओळखतो, मानतो आणि आदर करतो, त्या सुसंवाद भारताची प्रतिमा आता नष्ट होत आहे. देशासाठी आणि समाजासाठी, तो आरसा चेहरा दाखवण्यासाठी आरसा नसून स्वतःचा आत्मा दाखवण्यासाठी आरसा आहे. आपण आपला चेहरा कितीही स्वच्छ ठेवला तरी आपण त्याला सुंदर बनवू शकतो, पण आपल्या आत्म्याला दाखवणाऱ्या आरशाचा आपल्या देखाव्याशी काहीही संबंध नाही. म्हणून गांधीजींच्या विचारांचा आदर करा, हेच आपल्याला गांधीवादी बनवते.

जोपर्यंत आपण गांधीजींचे तत्त्वज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात लागू करत नाही तोपर्यंत त्यांच्या स्वप्नांचा भारत बांधला जाणार नाही. माझी चिंता अशी आहे की गांधीजींचे एका सणात रूपांतर केल्यानंतरही आपण देशाच्या आरशात आपल्या आत्म्याचे चित्र स्वीकारू शकू का? गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्याची ही वेळ आहे, त्यांचे नाव दिवसरात्र घेतले जात आहे. पण त्यांना त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या विचारसरणीत कोणतेही स्थान दिले जात नाही. त्याचा खूप वाईट परिणाम झाला आहे. गांधींच्या नावाने मोठे कार्यक्रम आयोजित करण्याची स्पर्धा प्रत्यक्षात जनतेला गोंधळात टाकणारी आहे. सरकार गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालले आहे हे जनतेला सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि या आधारावर त्यांच्याकडून पाठिंबा मागितला जात आहे.

जेव्हा लोक मूर्खपणे एखाद्याचे समर्थन करतात, तेव्हा असे लोक अभिमानाने म्हणतात की ते लोकांनी निवडून दिले आहेत. हे गांधी तत्त्वज्ञानाचे राजकीय षडयंत्र आहे. पण मला समजले, जे खरे आहे, ते कधीच संपणार नाही. इतिहास साक्षी आहे की जे सत्य आहे, थोड्या काळासाठी फसवले जाऊ शकते, परंतु कोणतीही शक्ती कधीही वास्तविक परिणामाला संपवू शकत नाही. जर गांधीजींना अशा प्रकारे फसवणे सोपे असते, तर आतापर्यंत जगातील गांधीजींचा प्रभाव संपला असता. पण तसे झाले नाही. प्रत्येक उत्तीर्ण दिवसाबरोबर गांधीजी पूर्वीपेक्षा अधिक महत्वाच्या आणि जगाची गरज बनले आहेत, जे लोक गांधीजींच्या मूर्तीची पूजा करण्याच्या बहाण्याने त्यांच्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना हे माहित असले पाहिजे की बनावट भक्ती पटकन उघडकीस येते.

गांधीजींसोबतही असेच काही घडत आहे किंवा मरयदा पुरुषोत्तम राम यांच्या बाबतीत घडत आहे. जे रामाचे भक्त म्हणवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना मरयदा पुरुषोत्तम रामाची आठवण येत नाही, ज्यामुळे त्यांना देवाचा दर्जा मिळाला. त्यांना फक्त रामचे नाव घेऊन आपले राजकारण चमकवायचे आहे. गांधींच्या बाबतीतही तेच घडत आहे. या काळातील राजकारणी मूर्तीपूजा असल्याचे भासवतात, परंतु ज्यांना ते त्यांचे आदर्श मानतात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा कधीही प्रयत्न करू नका. कारण त्यांना ते खूप कठीण वाटते आणि हे देखील खरे आहे की त्यांचा स्वभावही वेगळा आहे. आजच्या युगात, राजकारण आयकॉनिक उपासनेच्या बहाण्याने आपली उद्दिष्टे एकत्रित करण्याचा प्रयत्न करते. या अनुक्रमात जरी त्याला स्वतःच्या आदर्शाच्या प्रतिमेवर अन्याय करावा लागला.

बापूंबाबतही तेच प्रयत्न केले जात आहेत. पण जनता आता अशी राहिली नाही की ते राजकारण्यांकडून बराच काळ फसवले जात आहेत. जनतेला आता गोंधळात टाकणे सोपे नाही. होय, काही लोक गोंधळून जात आहेत, याचे कारण असे आहे की आजच्या जगात असे लोक नाहीत ज्यांची तुलना गांधीजींशी केली जाऊ शकते किंवा ज्यांना आजच्या युगाचे गांधी म्हटले जाऊ शकते. कोणत्याही महान आत्म्याने दाखवलेले प्रेम आपल्या आचरणात आणि वागण्यात दिसून येते जर ते खरे किंवा अस्सल प्रेम असेल तरच. बापूंसाठी आता तुम्ही जे प्रेम पाहता, जी भक्ती तुम्ही पाहता ती एक लबाडी आहे. बापूंच्या नावावर स्वतःचा अजेंडा ठरवण्याचा डाव आहे, एक प्रकारे बापूचा वापर केला जात आहे. याचा फायदा देशाला होणार नाही, देशाने तेव्हाच फायदा होईल जेव्हा आपण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालू.

!! जय हिंद !! वंदे मातरम !!

महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण क्र. २- Speech on Mahatma Gandhi Jayanti in Marathi

आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपणा सर्वांना सुप्रभात. माझे नाव मयूर आहे, मी ७ व्या वर्गात शिकतो. मला गांधी जयंतीनिमित्त भाषण द्यायला आवडेल. सर्वप्रथम मी माझ्या वर्ग शिक्षकाचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला अशा महान प्रसंगी भाषण देण्याची संधी दिली. आपल्या सर्वांना माहित आहे की दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी आपण सर्वजण महात्मा गांधींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमतो. माझ्या प्रिय मित्रांनो, गांधी जयंती केवळ त्यांच्याच देशात नाही तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते कारण ते आयुष्यभर अहिंसेचे प्रणेते होते.

त्यांचे पूर्ण नाव मोहनदास क्रमचन्द्र गांधी आहे, जरी ते बापू आणि राष्ट्रपिता आणि महात्मा गांधी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. या दिवशी महात्मा गांधींना त्यांच्या समाधी स्थळावर नवी दिल्लीतील राज घाटावरील पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून प्रार्थना, फुले, स्तोत्र इत्यादीद्वारे श्रद्धांजली अर्पण केली जाते.

गांधी जयंती भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये साजरी केली जाते ज्याने गांधींना नेहमी एक डोळ्याने सर्व धर्म आणि समुदायाचा आदर केला. या दिवशी पवित्र धार्मिक पुस्तकांमधून दोहा आणि प्रार्थना वाचल्या जातात विशेषतः त्यांचे आवडते स्तोत्र “रघुपती राघव राजा राम”. देशातील राज्यांच्या राजधान्यांमध्ये प्रार्थना सभा आयोजित केल्या जातात. भारत सरकारने या दिवशी राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केल्याप्रमाणे, सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालये इत्यादी संपूर्ण देशात बंद असतात.

महात्मा गांधी हे एक महान व्यक्ती होते ज्यांनी खूप संघर्ष केला आणि ब्रिटिश राजवटीपासून भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली. ब्रिटीश राजवटीविरुद्ध भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते केवळ अहिंसेच्या अनोख्या पद्धतीचे प्रणेते नव्हते, तर त्यांनी जगाला सिद्ध केले की अहिंसेचा मार्ग अवलंबून शांततापूर्ण मार्गाने स्वातंत्र्य मिळवता येते. शांतता आणि सत्याचे प्रतीक म्हणून ते आजही आपल्यामध्ये स्मरणात आहेत.

!! जय हिंद !!

महात्मा गांधींवरील भाषण क्र. ३ – Mahatma Gandhi Speech In Marathi

आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपणा सर्वांना सुप्रभात. जसे आपण सर्वांना माहीत आहे की आपण सर्वजण गांधी जयंती नावाचा एक सुंदर सण साजरा करण्यासाठी येथे आलो आहोत, या निमित्ताने मला आपल्या सर्वांसमोर भाषण द्यायचे आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, २ ऑक्टोबर हा महात्मा गांधींची जयंती असते.

आम्ही हा दिवस दरवर्षी संपूर्ण उत्साहाने साजरा करतो राष्ट्रपितांना आदरांजली देण्यासाठी तसेच ब्रिटिश राजवटीपासून देशासाठी स्वातंत्र्य संग्रामाच्या मार्गातील त्यांच्या धाडसी कार्याची आठवण करण्यासाठी. आम्ही संपूर्ण भारतात गांधी जयंती एक मोठी राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरी करतो. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास क्रमचन्द्र गांधी असून ते बापू आणि राष्ट्रपिता म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

२ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो कारण ते आयुष्यभर अहिंसेचे प्रचारक होते. १५ जून २००७ रोजी २ ऑक्टोबर हा संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला आहे. शांती आणि सत्याचे प्रतीक म्हणून आम्ही बापूंना नेहमी लक्षात ठेवू. बापूंचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या छोट्या शहरात झाला, त्यांनी आयुष्यभर फार मोठी कामे केली.

ते वकील होते आणि त्यांनी इंग्लंडमधून कायद्याची पदवी घेतली होती आणि दक्षिण आफ्रिकेत कायद्याचा सराव केला. “सत्य बरोबर प्रयोग” या त्यांच्या चरित्रात त्यांनी त्यांचा स्वातंत्र्याचा संपूर्ण इतिहास कथन केला आहे. स्वातंत्र्य प्राप्त होईपर्यंत त्यांनी आयुष्यभर भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश राजवटीविरुद्ध पूर्ण संयम आणि धैर्याने लढा दिला.

गांधीजी साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणीचे होते, ज्यांना त्यांनी आपल्यासमोर एक उदाहरण म्हणून ठेवले. धूम्रपान, मद्यपान, अस्पृश्यता आणि मांसाहार यांना त्यांचा तीव्र विरोध होता. त्यांच्या जयंतीच्या दिवशी भारत सरकारने दारूवर पूर्णपणे बंदी घातली आहे. ते सत्य आणि अहिंसेचे प्रणेते होते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह चळवळ सुरू केली.

प्रार्थना, फुले अर्पण करणे, गांधीजींना त्यांचे आवडते गाणे “रघुपती राघव राजा राम” वाजवून श्रद्धांजली वाहणे यासारख्या तयारीसह नवी दिल्लीतील राज घाट येथे साजरा केला जातो. मी त्याचा एक महान शब्द तुमच्या सर्वांसोबत सामायिक करू इच्छितो, “एक व्यक्ती त्याच्या विचारांनी तयार केलेला प्राणी आहे, तो जे विचार करतो तो बनतो”.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Mahatma Gandhi speech in Marathi

Mahatma Gandhi Speech In Marathi | महात्मा गांधी भाषण मराठीत

Mahatma Gandhi Speech In Marathi – आज या ब्लॉग पोस्ट Mahatma Gandhi Speech In Marathi, Mahatma Gandhi Bhashan Marathi, Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi, Mahatma Gandhi Speech Marathi मध्ये विषयी केली जाणारे भाषण याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आपण या भाषणाचा वापर पहिलीपासून दहावीपर्यंत करू शकता.

Mahatma Gandhi Speech In Marathi

नमस्कार येथे जमलेल्या आदरणीय प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य शिक्षक आणि मित्र मित्रांनो आज आपण महात्मा गांधीजी जयंती साजरी करण्यासाठी आपण येथे जमलो आहे. आज मी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल भाषण देणार आहे.

जगाला व राष्ट्राला शांततेचा संदेश ज्यांनी दिला. आपल्या कृतीतून व विचारातून सत्याचा मार्ग दाखवला, सत्यातून परिवर्तन होऊन देश स्वतंत्र होऊ शकतो. हे दाखवण्याचे पवित्र कार्य महात्मा गांधींजी यांनीकेले.

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी . गांधीजींचा जन्म पोरबंदर (गुजरात) या गावामध्ये २ ऑक्टोबर १८६९ साली गांधीजी यांचा जन्म झाला होता सामान्य कुटुंबात जन्माला आलेले गांधीजी दहावीच्या शिक्षणानंतर विदेशामध्ये शिक्षणासाठी गेले. प्रचंड अभ्यास व आत्मविश्वासाच्या बळावरती बॅरिस्टर ही पदवी संपादन केली. पाश्चिमात्य राष्ट्रात ज्यावेळी गांधीजी गेले, त्यावेळी असमतोल पाहावयास मिळाला. ज्यावेळी आफ्रिकेत होते त्यावेळी काळे गोरे या भेदभावाला त्यांना सामोरे जावे लागले. त्याचवेळी गांधीजींच्या हळव्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. ज्या ठिकाणी मनुष्याला पशूसारखी वागणूक मिळत असेल तर त्या वेळी त्या ठिकाणी लोकांचे आयुष्य कसे असेल ह्याचा प्रश्न त्यांचा समोर उद्भवला .त्याचवेळी गांधीजींनी आफ्रिकेमध्ये परिवर्तनाच्या लढाईस सुरुवात केली.

काही कालखंडांनंतर भारतामध्ये आल्यानंतर एका नवीन लढ्याला सुरुवात करावी अशीच मानसिकता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली तेव्हाच परकीय सत्तेविरुद्ध संयम, त्याग शांतता यांच्या माध्यमातून एका नव्या लढाईस सुरुवात केली. गांधीजींनी १९२० च्या कालखंडामध्ये असहकार चळवळीची सुरुवात केली. या देशातल्या साध्य जनतेला इंग्रज या देशाचे प्रशासक नसून ते या जनतेचे शोषक आहेत. जे इंग्रज व्यापारी म्हणून आले होते ते देशाचे राज्यकर्ते बनले ह इथल्या भारतीयांना खूप समजावूनदेण्याचा प्रयत्न केला.

१९१५ मध्ये गांधी भारतात परत आले . १९२० साली चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले. खिलाफत चळवळ यामध्ये सहभाग घेतला. इंग्रजांशी असहकार पद्धतीने वागलो तर इंग्रज एक दिवस स्वतःचा कारभार सोडून विदेशात निघून जातील असहकार चळवळीचा स्वीकार केला. अशा पद्धतीने गांधीजींनी ही असहकार चळवळ मोठी करण्याचा प्रयत्न केला. पण ब्रिटिशांनी आपल्या फोडा आणि झोडा याच नीतीचा उपयोग केला. यास गांधीजींनी विरोध केला. सर्वसामान्य जनतेचे शोषण हे मोठ्या प्रमाणात होत होते. इंग्रजांनी मिठावरती कर लावून मिठासाठी कायदा तयार केला होता. या अत्याचाराविरोधात गांधीजींनी आंदोलन छेडले आणि इंग्रजांच्या दडपशाही धोरणाचा निषेध केला.

१९४२ साली मुंबईच्या गवालीया टँकवरून भाषण करताना महात्मा गांधींनी सांगितले होते, ‘करेंगे या मरेंगे ‘ हा मंत्र दिला आणि लाखो माणसे मुंबईच्या गवालिया टँकवर गोळा केली. इंग्रजांना चालते व्हा असा सल्ला दिला. ‘साधी राहणी उच्च विचारसरणी ‘ आत्मसात करणारे महामानव म्हणून महात्मा गांधीजींच्याकडे पाहिले जाते. भारतीय स्वातंत्र्य लढा एका निर्णायक वळणावरती घेऊन जाणारे महापुरुष म्हणून वर्णन केले जाते. स्वातंत्र्य लढ्याबरोबरच ‘रामराज्य’ निर्माण व्हावे यासाठीही प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. स्वतःच्या लज्जा रक्षणापुरतेच वस्त्रे वापरणारा हा महापुरुष असंख्य, करोडो बांधवांचा अश्रयदाते प्रेरणास्थान होते. स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबर मूलोद्गामी शिक्षणाची संकल्पना मांडण्याचे काम महात्मा गांधीजींनी केले.

हे सुद्धा वाचा – Savitribai Phule Speech In Marathi

या देशामध्ये समता प्रस्थापित व्हायची असेल तर देश एकसंघ असावा तरच जातीयता नष्ट होईल. हे महात्मा गांधीजींचे प्रखर विचार होते. याच कल्पनेतून महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकत्र येऊन जाती निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केले. या देशामध्ये क्रांती करायचीच असेल तर ती शस्त्रास्त्राच्या जोरावरती न करता ती संयमाच्या, शांततेच्या मार्गाने करता येते. हे विचार आमच्या समोर ठेवण्याचे पवित्र कार्य महात्मा गांधीजींनी केलेले पाहावयासमिळते. अशा या महापुरुषांच्या प्रेरणेतून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

महात्मा गांधी यांचे काम पाहून “ महात्मा “ ही उपाधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना दिली. खरंच हा माणूस आपल्या नावाप्रमाणे तितकाच महान होता हे त्यांच्या कार्यातून पहावयास मिळते . १५ ऑगस्ट १९४७ ला या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी हिंदू आणि मुस्लीम यांच्यामध्ये भारत पाकिस्तान यांच्या फाळणीवरून धार्मिक तेढ निर्माण झाला होता. त्यावेळी असंख्य लोक जातीय दंगली निर्माण करण्यात मग्न असताना गांधीजी मात्र दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी दंगलीमध्ये होरपळलेल्यांची घरे सावरण्यासाठी महात्मा गांधीजी प्रयत्न करत होते. देश एका वेगळ्या वळणावरती जात असताना हरितक्रांतीला सुरुवात होत असताना परदेशी संस्कृती झुगारून १५० वर्षांनंतर आमची भारतभूमी,स्वातंत्र्याचे गीत गात होती. स्वतंत्र, समता, बंधुता या नीतिमूल्यांचा आदर्श जपत असता ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाली. ‘जगेन तर देशासाठी, मरेन तर मातृभूमीसाठी ‘ असं म्हणणाऱ्या महात्म्याचं दुःखद निधन झालं.

काळाबरोबर वेळेला स्वातंत्र्याबरोबर क्रांतीला गवसणी घालणारे महापुरुष होते. अखंड विश्वासाठी एक प्रेरणास्रोत होते. त्याच महापुरुषाचा आपण आदर्श घेऊन त्यांच्या स्वप्नातील आपण भारतमातेचे सुपुत्र देश साकार करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जय हिंद! जय भारत!!

हे सुद्धा वाचा – Mahatma Gandhi Information In Marathi

निष्कर्ष | Conclusion

आम्ही दिलेल्या माहितीचा उपयोग , Mahatma Gandhi Speech In Marathi, Mahatma Gandhi Bhashan Marathi, Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi, Mahatma Gandhi Speech Marathi या भाषणसाठी उपयोग करू शकता. वरील भाषण एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे. .वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही कॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

' src=

2 thoughts on “Mahatma Gandhi Speech In Marathi | महात्मा गांधी भाषण मराठीत”

  • Pingback: जवाहरलाल नेहरू विषयी भाषण | Pandit Jawaharlal Nehru Speech In Marathi - Roar Marathi
  • Pingback: महाराष्ट्र दिनानिमित्त एकदम नवीन भाषण | Best Maharashtra Din speech in Marathi 2024 - Roar Marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

  • Choose your language
  • धर्म संग्रह
  • महाराष्ट्र माझा

मराठी ज्योतिष

  • ग्रह-नक्षत्रे
  • पत्रिका जुळवणी
  • वास्तुशास्त्र
  • दैनिक राशीफल
  • साप्ताहिक राशीफल
  • जन्मदिवस आणि ज्योतिष
  • लव्ह स्टेशन
  • मराठी साहित्य
  • मराठी कविता

अयोध्या‍ विशेष

  • ज्योतिष 2021
  • मराठी बातम्या
  • महात्मा गांधी
  • 104 शेयरà¥�स

संबंधित माहिती

  • गांधींनी लिहिलेले पुस्तके व त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके
  • महात्मा गांधी यांचे लॉर्ड माऊंटबॅटन यांना पत्र....
  • दुसऱ्याच्या वेदना समजणारे खरे धार्मिक
  • प्रेमात एवढी ताकद आहे की कोणालाही आपलंसं करू शकतं
  • व्यक्ती स्वच्छ नाही तर स्वस्थ नाही: महात्मा गांधींचे विचार

महात्मा गांधी- निबंध मराठी मध्ये

mahatma gandhi best speech in marathi

  • वेबदुनिया वर वाचा :

अशोक आणि गोल्डी मसाल्यांची ही उत्पादने खाण्यायोग्य नाहीत, पाकिटांमध्ये कीटक आणि कीटकनाशके आढळल्यानंतर विक्रीवर बंदी

अशोक आणि गोल्डी मसाल्यांची ही उत्पादने खाण्यायोग्य नाहीत, पाकिटांमध्ये कीटक आणि कीटकनाशके आढळल्यानंतर विक्रीवर बंदी

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कामिका एकादशी 2024 मुहूर्त आणि व्रत कथा

कामिका एकादशी 2024 मुहूर्त आणि व्रत कथा

श्रावण महिन्यात या पाचपैकी कोणतेही एक रोप घरी आणा, देवी लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळेल

श्रावण महिन्यात या पाचपैकी कोणतेही एक रोप घरी आणा, देवी लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळेल

साप्ताहिक राशीफल 29 जुलै ते 04 ऑगस्ट 2024

साप्ताहिक राशीफल  29 जुलै  ते 04 ऑगस्ट 2024

अधिक व्हिडिओ पहा

mahatma gandhi best speech in marathi

IND vs ARG Hockey :भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना अनिर्णित, आता सामना आयर्लंडशी होणार

IND vs ARG Hockey :भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना अनिर्णित, आता सामना आयर्लंडशी होणार

किवळे भागात ब्लू व्हेल गेमच्या नादात इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

किवळे भागात ब्लू व्हेल गेमच्या नादात इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

Blood in Burger बर्गरमध्ये रक्त, मुलीने केचप समजले; आईने ते पाहिल्यावर तिचे भान हरपले

Blood in Burger बर्गरमध्ये रक्त, मुलीने केचप समजले; आईने ते पाहिल्यावर तिचे भान हरपले

कोचिंग सेंटर अपघात प्रकरणी तळघर मालकासह पाच जणांना अटक

कोचिंग सेंटर अपघात प्रकरणी तळघर मालकासह पाच जणांना अटक

व्हॉट्सॲपचे नवीन डबल टॅप फीचर्स, वैशिष्टये जाणून घ्या

व्हॉट्सॲपचे नवीन डबल टॅप फीचर्स, वैशिष्टये जाणून घ्या

  • मराठी सिनेमा
  • क्रीडा वृत्त
  • शेड्‍यूल/परिणाम
  • आमच्याबद्दल
  • जाहिरात द्या
  • आमच्याशी संपर्क साधा
  • प्रायव्हेसी पॉलिसी

Copyright 2024, Webdunia.com

mahatma gandhi best speech in marathi

Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास

महात्मा गांधी यांचे अनमोल विचार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना सगळे लोक बापू या नावाने देखील ओळखतात. जेव्हाही आपण महात्मा गांधीच नाव एकतो तेव्हा आपल्याला त्यांनी दिलेली शांती, अहिंसा ही शिकवण आठवते. त्यांनी अहिंसेच्या रस्त्यावर चालुनच आपल्या देशासाठी बलिदान दिल. त्यांचे विचार खूप पराभवी होते आज तेच विचार आम्ही आमच्या या लेखाद्वारे तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत, चला तर बघूया महात्मा गांधी यांचे अनमोल विचार….

महात्मा गांधी यांचे अनमोल विचार – Mahatma Gandhi Quotes in Marathi

Marathi Quotes by Mahatma Gandhi

“चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा.”

“गरीबी हा हिंसाचाराचा सर्वात वाईट प्रकार आहे.”

Mahatma Gandhi Che Vichar in Marathi

Mahatma Gandhi Che Vichar in Marathi

“हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते”

“काहीतरी करताना, एकतर ते प्रेमाने करा किंवा कधीही करु नका.”

Mahatma Gandhi Che Vichar

Mahatma Gandhi Che Vichar

“मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो.”

“मी केवळ लोकांच्या चांगल्या गुणांकडे पाहत आहे, त्यांच्या चुका मोजत नाही.”

Mahatma Gandhi Marathi Quotes

Mahatma Gandhi Marathi Quotes

“तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नव्हे तर ते विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेलं आहे.”

“दुर्बल व्यक्ती कधी माफी मागत नाही आणि क्षमा करणे हे सामर्थ्यवान व्यक्तीचे वैशिष्ट्य आहे.”

Marathi Quotes by Mahatma Gandhi

Mahatma Gandhi Quotes in Marathi

“आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल.”

“ज्या दिवसापासून स्त्रीयां सुरक्षितपणे रात्री रस्त्यावर मोकळेपणाने चालू शकतात, त्या दिवसापासून आपण असे म्हणू शकतो की भारताने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवले आहे.”

Mahatma Gandhi Quotes

“असे जगा, जसे तुमचा उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि असे शिका, जसे तुम्हाला कायम जिवंत राहायचे आहे.”

“राग आणि असहिष्णुता हे समजूतदारपणाचे शत्रू आहेत.”

Mahatma Gandhi Thoughts in Marathi

Mahatma Gandhi Thoughts in Marathi

“धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.”

‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.”

Mahatma Gandhi Thoughts

Mahatma Gandhi Thoughts

“कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमानं जिंका”

“त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही, ज्यात चूक करण्याचे स्वातंत्र्य नाही.”

Mahatma Gandhi Vichar Marathi

Mahatma Gandhi Vichar Marathi

“भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे की, आज तुम्ही काय करताय.”

“सोन्या चांदीचे तुकडे नव्हे तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.”

Mahatma Gandhi Vichar

Mahatma Gandhi Vichar

“आपली चूक स्वीकारणे हे झाडू मारण्यासारखेच आहे जे पृष्ठभाग चमकदार आणि स्पष्ट करते.”

“अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे.”

Editorial team

Editorial team

Related posts.

Rakhi Wishes in Marathi

खास करा यावर्षीच रक्षाबंधन पाठवा हे शुभेच्छा संदेश

Raksha Bandhan Quotes in Marathi रक्षाबंधन हा असा सण आहे ज्यादिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला आयुष्यभर तिच्या...

फादर्स डे कोट्स इन मराठी

फादर्स डे कोट्स इन मराठी

Marathi Father Day Quotes  जीवनातील अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला मिठी मारणे खूप कठीण असतं, आणि ती व्यक्ती म्हणजे आपले वडील....

Holi SMS in Marathi

रंगाचा उत्सव होळी च्या रंगीत शुभेच्छा

Holi Wishes in Marathi होळी हा सण वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणाऱ्या सणा मधील एक प्रमुख सण आहे. या...

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

  • India Today
  • Business Today
  • Harper's Bazaar
  • Brides Today
  • Cosmopolitan
  • India Today Hindi
  • Reader’s Digest
  • Aaj Tak Campus

mahatma gandhi best speech in marathi

Mahabharata-like chakravyuha in country now: Rahul Gandhi in Lok Sabha

India Today Video Desk

Speaking in the Lok Sabha on Monday, Leader of the Opposition, Rahul Gandhi, said the country is today trapped in a 'chakravyuh', which is represented by the Lotus symbol (of the BJP). Rahul Gandhi also alleged there is an atmosphere of fear in India. "India is trapped in a 'chakravyuh' represented by the Lotus symbol that Prime Minister Narendra Modi wears on his chest," the Congress leader said.

VIDEOS FROM OTHER SECTIONS

Latest videos.

Dhinidhi Desinghu

Exclusive: Teenager Desinghu 'honoured' to compete with world's best at Olympics

At 14 years and 70 days, Dhinidhi Desinghu, in an exclusive interview with India Today, says she feels honoured to compete with the world's best and become the youngest Olympian in the 117-member Indian contingent for the 2024 Paris Olympics. The 14-year-old Desinghu clocked 2:06.96 to top heat 1 but finished 23rd among 30 swimmers across four heats and failed to progress.

bjp

Rajya Sabha discusses deaths of 3 UPSC aspirants at Delhi coaching centre

Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar on Monday deferred a decision on allowing a discussion regarding the recent deaths of UPSC aspirants at a Delhi coaching centre, citing lack of agreement between the ruling party and the opposition. Several members, including Sudhanshu Trivedi, Ram Chandra Jangra, Surendra Singh Nagar from BJP, Swati Maliwal from AAP and John Brittas from CPI (M) had sought a discussion under Rule 267, which allows for suspension of the day's business to debate urgent matters.

mahatma gandhi best speech in marathi

Video: Kanwariyas vandalise, overturn car with illegal police sticker in Ghaziabad

The police clarified that the car was a private vehicle.

Bulldozer

Bulldozers demolish 'illegal' structures in Delhi after death of 3 UPSC aspirants

The Municipal Corporation of Delhi (MCD) on Monday deployed bulldozers to demolish the illegal structures in Delhi's Old Rajendra Nagar area. The action came days after three UPSC aspirants died due to flooding in the basement of a coaching centre. The Delhi's civic body has also terminated one junior engineer and suspended one Assistant Engineer (AE) after the matter.

IMAGES

  1. Mahatma Gandhi che vichar in marathi

    mahatma gandhi best speech in marathi

  2. महात्मा गांधी भाषण मराठी Best Mahatma Gandhi Speech In Marathi

    mahatma gandhi best speech in marathi

  3. महात्मा गांधी मराठी भाषण 2018

    mahatma gandhi best speech in marathi

  4. महात्मा गांधी भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi इनमराठी

    mahatma gandhi best speech in marathi

  5. Gandhi Marathi Quotes : Gandhi Marathi Suvichar

    mahatma gandhi best speech in marathi

  6. Mahatma Gandhi Speech in Marathi

    mahatma gandhi best speech in marathi

VIDEO

  1. महात्मा गांधी भाषण / निबंध

  2. महात्मा गांधीजींचा जीवन परिचय

  3. Mahatma Gandhi Best quotes #mahatamagandhi #qoutes #shorts

  4. Rahul Gandhi: Narendra Modi यांना देवासोबत बसवलं तर ते देवाला सांगतील, विश्व कसं काम करतं #shorts

  5. महात्मा गांधी 10 ओळी मराठी निबंध/10 lines essay on Mahatma Gandhi in Marathi/Mahatma Gandhi nibandh

  6. महात्मा गांधी मराठी निबंध / Essay on mahatma gandhi

COMMENTS

  1. महात्मा गांधी भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi

    रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या बापूंना सर्वप्रथम "महात्मा" ही उपाधी धारण केली होती. "बापू सन्मान करतो आम्ही, तुमच्या महान ...

  2. महात्मा गांधी भाषण मराठी Best Mahatma Gandhi Speech In Marathi Language

    महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Speech In Marathi Language - भाषण क्र. 2 प्रिय मित्रांनो- आजच्या भाषण समारंभात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.

  3. महात्मा गांधी वर मराठी निबंध

    Essay On Mahatma Gandhi in Marathi महात्मा गांधी, ज्यांना मोहनदास करमचंद गांधी म्हणूनही ओळखले जाते, ते विसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली नेते आणि

  4. महात्मा गांधी मराठी भाषण

    Mahatma Gandhi Speech in Marathi. gandhi jayanti speech in marathi सम्पुर्ण महात्मा गांधी मराठी भाषण ६वी ७ वि १० वी व १२ वि करीत मराठी मध्ये.

  5. महात्मा गांधी " वर मराठी भाषण Mahatma Gandhi Speech In Marathi

    Mahatma Gandhi Speech In Marathi तुम्हाला कसे वाटले आम्हाला जरूर कळवा ! हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-Child Labour Essay In Marathi. Doordarshan Essay In Marathi

  6. Mahatma Gandhi Essay महात्मा गांधी यांच्यावर निबंध

    Mahatma Gandhi Essay महात्मा गांधी यांच्यावर निबंध मोहन दास करमचंद गांधी ह्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला.

  7. 3+ महात्मा गांधी जयंती भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi

    महात्मा गांधी जयंती भाषण क्र. ३ Mahatma Gandhi Jayanti bhashan in Marathi. आदरणीय महोदय आणि उपस्थित असलेले नागरिक, (mahatma gandhi bhashan marathi) द्रष्टे नेते महात्मा गांधी ...

  8. महात्मा गांधीजी 10 ओळीचे भाषण

    गांधी जयंती खूप सोपे आणि सुंदर भाषण मराठी / Mahatma Gandhi Speech in Marathi/ Gandhi Jayanti Bhashan

  9. महात्मा गांधी

    महात्मा गांधी : जीवन आणि कार्य (अनुवादित, मूळ इंग्रजी The Life of Mahatma Gandhi, लेखक - लुई फिशर; मराठी अनुवादक : वि.रा. जोगळेकर). हेच पुस्तक वाचून ...

  10. महात्मा गांधी जयंती भाषण 10 ओळी 2023

    महात्मा गांधीजी जयंती निमित्त 10 सोप्या ओळी 2023 | 10 lines speech on mahatma Gandhi jayanti in Marathi 2023. महात्मा गांधी जयंती भाषण 2 October Mahatma Gandhi speech in Marathi: 2 ऑक्टोंबर म्हणजेच ...

  11. (2024) महात्मा गांधी जयंती भाषण मराठी

    महात्मा गांधी भाषण मराठी Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi : तर मंडळी वरील लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 2 महात्मा गांधी जयंती भाषण शेअर केलेत. आशा आहे ...

  12. महात्मा गांधी भाषण मराठी

    महात्मा गांधी जयंती भाषण | Mahatma Gandhi Bhashan in MarathiTopics covered in this video:- 1. mahatma gandhi speech in marathi2. mahatma gandhi speech in ...

  13. Mahatma Gandhi

    This video has Mahatma Gandhi Speech in Marathi. Information about Mahatma Gandhi in Marathi is present. Speech on gandhi jayanti in marathi language can be ...

  14. महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 2024

    तुम्हाले महात्मा गांधी भाषण मराठी mahatma gandhi bhashan mahatma gandhi speech in marathi भाषण कसे वाटले हे कळण्यासाठी खाली कमेंट मध्ये नक्की सांगा.जर तुम्हाला हे ...

  15. महात्मा गांधी जयंती विशेष भाषण |Mahatma Gandhi speech in Marathi

    "माझे जीवन हाच माझा संदेश"असे म्हणत संपूर्ण जगाला अहिंसा व ...

  16. महात्मा गांधी जयंती निमित्त ३ उत्स्फूर्त भाषणे

    महात्मा गांधीजी वरील भाषण क्र. १- Speech on Mahatma Gandhi Jayanti in Marathi; महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण क्र. २- Speech on Mahatma Gandhi Jayanti in Marathi

  17. Mahatma Gandhi Speech In Marathi

    आम्ही दिलेल्या माहितीचा उपयोग , Mahatma Gandhi Speech In Marathi, Mahatma Gandhi Bhashan Marathi, Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi, Mahatma Gandhi Speech Marathi या भाषणसाठी उपयोग करू शकता. वरील भाषण एकदम ...

  18. महात्मा गांधी- निबंध मराठी मध्ये

    आपल्या अहिंसात्मक - Marathi Essay of gandhi ji. रविवार, 28 जुलै 2024. Choose your language;

  19. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती

    महात्मा गांधी यांचा अल्पपरिचय - Mahatma Gandhi History in Marathi. नाव (Name) मोहनदास करमचंद गांधी. जन्म (Birthday) २ ऑक्टोबर १८६९. जन्मस्थान (Birthplace) पोरबंदर, गुजरात ...

  20. Mahatma Gandhi Speech in Marathi

    Mahatma Gandhi Speech in Marathi | महात्मा गांधी भाषण मराठी | Mahatma Gandhi Marathi Bhashan Disclaimer & Copyright This ...

  21. महात्मा गांधी जयंती भाषण मराठी

    महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi | Mahatma Gandhi jayanti bhashan ...

  22. महात्मा गांधी भाषण मराठी

    #mahatmagandhibhashan#mahatmagandhibhashanmarathi#mahatmagandhi#marathibhashan #mahatmagandhinibandh ##mahatmagandhinibandhmarathi#mahatmagandhispeech#gandhi...

  23. महात्मा गांधी यांचे अनमोल विचार

    Mahatma Gandhi Che Vichar in Marathi. Mahatma Gandhi Che Vichar in Marathi. "हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र ...

  24. Rahul Gandhi in Parliament says mahabharata-like chakravyuha in country

    Speaking in the Lok Sabha on Monday, Leader of the Opposition, Rahul Gandhi, said the country is today trapped in a 'chakravyuh', which is represented by the Lotus symbol (of the BJP). Rahul Gandhi also alleged there is an atmosphere of fear in India. "India is trapped in a 'chakravyuh' represented by the Lotus symbol that Prime Minister Narendra Modi wears on his chest," the Congress leader said.